Wednesday, August 6, 2025

बापू जन्मदिवस

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून व ३३ वर्षे श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे त्यांनी शाळाबाह्य होऊ नये ही मनात; उर्मी असणारे शांताराम बापू काळे यांचा ५९वा वाढदिवस; आज ५ऑगष्ट २०२४ रोजी आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच राजूर येथिललक्ष्मण काळे गुरुजी व गंगुबाई यांचे ते चिरंजीव ५बहिणी ३भाऊ असे त्यांचे कुटुंब वडील शिक्षक त्यांना तोटका पगार त्यामुळे इयत्ता सातवी पासून बापू रोजगाराच्या शोधात कधी दुष्काळी कामावर तर कधी बाजारहाट ,यात्रा,मध्ये किराणा मालाची विक्री तर कधी फोटो स्टुडियो मध्ये काम त्यांनी कामाची कधी लाज बाळगली नाही सतत काम व शिक्षण घेत त्यांनी सायकलवर वृत्तपत्र विक्रीचे काम केले त्यातून शिक्षण घेतले तर विमा विकास अधिकारी उत्तम जगधने यांनी त्यांची जिद्द व चिकाटी पाहून त्यांना विमा प्रतिनिधी केले त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर वृत्तपत्र विक्री करताना पत्रकारिता देखील त्यांनी सुरू केल्याने विमा व्यवसायातून आर्थिक प्रश्न मार्गी लागले तर पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी चे संस्कार रुजवत त्यांचा अविरत पणे प्रवास सुरु झाला तो आजपर्यंत न थकता पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक ,दूध उत्पादक,बेरोजगारी, अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला; प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ३६ कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप; व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात .; कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे; ठाकरवाडी येथील आदिवासी गतिमंद महिला बिट्टी,तिचा दोन वर्षांचा मुलगा यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून त्यांच्या जगण्याचे सार्थक केले तर बांगर वाडी येथील वृद्ध महिलेस सरकारी पेन्शन सुरू केली,कौठवाडी येथील वनिता भांगरे हिची शिक्षणासाठी पायपीट हे वृत्त प्रसिद्ध करून महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येऊन हे कुटुंब सावरलेआज वनिताचे वडील परबत आई; भामाबाई यांना सरकारी पेन्शन सुरू असून कुटुंबाला घरकुल मिळाले आहे .तर वनिताला मोफत नर्सिंग साठी प्रवेश मिळाला आहे रतनवाडी येथील सोनाली ही फुले विकणारी मुलगी माजी प्राध्यापक रावसाहेब मोरे यांच्या दातृत्व गुणांच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आली .हे सर्व बापू मुळे झाले हे विशेष बापू तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वहिनी सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत; बापूना; गेली ३२ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास; नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ...त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ... अनिल काळे

Tuesday, July 29, 2025

अकोले तालुका पर्यटन

अकोले तालुका निसर्ग,पर्यावरण,इतिहास,भूगोल,भूशास्र,अशा अनेक दृष्टीने समृध्द आहे.तालुक्यातील चार मध्ययुगीन मंदिरे त्यात भाविकांप्रमाणे अभ्यासकांनाही अशीच भुरळ घालतात. यामध्ये टाहाकारीचे जगदंबा (अंबिका)मंदिर वगळता रतनवाडीचे अमृतेश्वर ,अकोल्याचे सिध्देश्वर आणि हरिश्चंद्र गडावरील हरिश्चंद्रेश्वर ही तीन मंदिरे शिवालये आहेत. तिथल्या शिल्पांचा बारकाईने अभ्यास केल्यास ही शिवाची तांत्रिक मंदिरे असावीत असा अंदाज करता येतो.अकोल्याचे डॉ.कुलकर्णी यांनी यासंबंधाने बराच अभ्यास केलेला आहे. या मंदिरांचे अनोखे स्थापत्य,त्यांचे सौंदर्य, त्यांची निर्मिती,मंदिरांची शिखरे,जंघा भागातील सूर सुंदरींची शिल्पे,आतले वितान या सगळ्या गोष्टींबरोबरच मंदिरांचा अधिकृत इतिहास समजून घ्यायचा असेल तर 'उज्ज्वल उद्यासाठी' या त्रैमासिकाचा हा अंक जरूर वाचा. आणखी एक,एक गोष्ट जरूर लक्षात ठेवा.अशा सुंदर मंदिर शैलीला अनेक जण 'हेमाडपंती'मंदिरे म्हणतात. ते 100 पक्के चूक आहे. हेमाडपंती म्हणजे 'हेमाद्री' नावाच्या यादवांच्या कारभा-याने बांधलेली.हा हेमाद्री तेराव्या शतकातला. ही मंदिरे दहाव्या-अकराव्या शतकातली. याबाबत याच अंकात आणखी जाणून घ्या.

भंडारदरा पाऊस

*भंडारदऱ्याचा पाऊस!* लेखक : भाऊसाहेब चासकर वैशाख सरता-सरता कळसूबाई-हरिश्चंद्रगडाच्या आसमंतात पश्चिमेकडून भन्नाट वारा वाहू लागतो. पाठोपाठ आकाशात काळे ढगही जमा होऊ लागतात. तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून पाऊस घाटाच्या दिशेने सरकू लागतो. बरसून गेलेली एखादी सर मागोमाग मान्सून येणार असल्याची वर्दी देऊन जाते. ग्रीष्माच्या तापलेल्या उन्हात चांगलीच भाजून निघालेली तांबडी माती जणू याचीच प्रतीक्षा करीत असते! पाठोपाठच कोकणकड्यांवरून पाऊस दाखल होतोही. पाहता-पाहता तो मस्त ताल धरतो. भंडारदर्‍याच्या पावसाला मुळातच एक नाद आहे. लय आणि सूरही आहे! म्हणूनच त्याचे येणे आनंदाचे गाणे होऊन जाते. लहान मोठी शिखरे, डोंगरमाथे जलरंगांच्या विविध छटांमध्ये न्हाऊन निघतात. माहेरी आल्यागत मोसमी पाऊस येथे नादावतो. अवघ्या चराचर सृष्टीशी त्याचे गुज सुरु होते आणि बघता-बघता सह्यगिरीच्या कुशीत थबथबतो अनोखा जलोत्सव! भंडारदर्‍याचा पाऊस म्हणजे सृष्टीला सुखावणारा, आनंदाचे गाणे गाणारा, जगण्याला उभारी देणारा, बळ देणारा, चित्तवृत्ती प्रसन्न करणारा... सर्वांना हवाहवासा वाटणारा! ऋतुचक्र पुढे-पुढे सरकतेय. वर्षामागून वर्षे लोटलीत. भंडारदर्‍याच्या पावसाचा स्वभाव फारसा बदललेला नाहीये. भंडारदर्‍याचा पाऊस पाऊसवेड्यांच्या मनाला मोहिनी घालत त्यांना हिरवे-ओले स्वप्न दाखवीत, आमंत्रण देत आलाय. दर वर्षी त्याच्या येण्याची सारेच आतुरतेने वाट पाहत असतात. कधी तो चातकासारखी वाट पाहायला लावतो. कधी अगदी वेळेवर दाखल होतो. कधी रिमझिम बरसतो. तर कधी बेभान होवून धो-धो कोसळताना भूमिपुत्रांना 'नको नको रे पावसा...!' अशी आर्त विनवणी करायला लावतो. तर असा हा इथला पाऊस. *पावसाळी रानभूल!* पर्वत-शिखरांच्या कानात कुजबुजणारे धुके... सैरावैरा धावणारा उनाड रानवारा आणि जोडीला भन्नाट गारवा... टपोऱ्या थेंबांनी ओघळणारा पाऊस... पर्वत-शिखरांच्या कडेकपारीतून-डोंगर उतारांवरुन उड्या घेत आवेगाने झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात, भंडारदरा धरणाच्या दिशेने खळाळत वाहणारे ओढ्या-नाल्यांचे अगणित प्रवाह... या ओढ्या-नाल्यांचे पाणी पिऊन खपाटीला गेलेल्या भंडारदर्‍याच्या जलाशयाचे पोट भरू लागते. मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी आणि कृष्णवंती या पूर्ववाहिनी नद्या दुथडी भरून वाहू लागतात. लालसर विटकरी पाण्याने भातखाचरे तुडुंब भरतात. या भातखाचरांत स्थानिक आदिवासींची चिखलणी आणि आवणीची लगबग सुरु असते. माळरानावर-पठारांवर दाटीवाटीने उगवलेले हिरवे-पोपटी गवत आणि साथीला असतो जीवाला वेडावून टाकणारा तो रानगंध... निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या सह्यगिरीच्या कुशीत आषाढ-श्रावणात असे परिपूर्ण निसर्गचित्रच जणू अवतीर्ण होते! यावं आणि धुंद होवून जावं, असं इथलं हे पावसाळी वातावरण. हा जलोत्सव बघायला, इथल्या या झिम्माड सरीत भिजायला पाऊसवेड्यांची केवढी मोठी झुंबड उडते! *रुपेरी जलधारांचे अगणित प्रपात!* पाऊस कोसळत असतो. वर्षा ऋतू धुंद नि कुंद. आभाळात निळ्या-काळ्या रंगाच्या राशी रचलेल्या. सूर्य जणू वर्षाकालीन रजेवर गेलेला! त्याची किरणे ढगातल्या ढगात विरलेली. नाचरा नाद करीत ओढे-नाले बेलगाम होऊन निघतात. डोंगर कड्यांवरून धबधबे कोसळू लागतात. वसुंधरा, बाहुबली, रंधा, नेकलेस, अम्ब्रेला... मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रदच्या रस्त्यावर अगणित धबधबे... जिकडे पहावे तिकडे धबधबे! विविध आकाराचे. प्रत्येकाचा आपला निराळा स्वभावविशेष! प्रत्येकाचे गाणे वेगळे, रूप-आकार सारे वेगळे. काही ज्ञानेशांच्या ओवीसारखे ओघळणारे! कुठे भाबडे तर कुठे आक्रमकतेने अंगावर येणारे तुकोबारायांच्या अभंगासारखे! साम्रदच्या सांधण व्हॅलीजवळ कड्यावरून पाण्याचा प्रवाह खाली कोसळतो तेव्हा पश्चिम बाजूने येणारा वारा पाणी हवेत उडवतो. हा रिव्हर्स वॉटरफॉल गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीला धुडकावून उंच हवेत उडतो. हे विलोभनीय दृश्य बघण्यात मौज असते. जीवाशिवाच्या भक्तीभावाने उड्या घेत सारे धबधबे आणि ओहोळ भंडारदरा धरणात आपला शेवट करतात. समर्पित होतात. इथे सह्यगिरीच्या दऱ्याखोऱ्यात वारा आणि धबधबे यांची झटपट भीम-जरासंधाच्या युद्धासारखीच असते. कुठे कुठे तर कड्यावरून कोसळणाऱ्या जलधारांना वारा पुन्हा वर लोटतो. गुरुत्वाकर्षणाला धुडकावून या पाऊसधारा खुशाल काळ्या मेघांत मिसळतात. साम्रदच्या धबधब्याचे ते अपूर्व दृश्य निसर्गाच्या अलौकिक शक्तीची जाणीव करून देते. रतनगड आणि हरिश्चंद्रगडाच्या डोंगरावरील धबधबे तसे काहीसे रांगडेच! यांचा शेवट दिसतो, आरंभ कायमच धुक्यात गुडूप झालेला! जलोत्सव बहरतो तसा रंधा धबधबा पुन्हा तरुण होऊन; अजून यौवनात मी...' असे गाणे म्हणत आपल्याच नादात बेभान होऊन कोसळत असायचा. निळवंडे धरणाचे बॅक वॉटर रंधा धबधब्याला पोटात घेते... त्याच्या चाहत्यांची घोर निराशा होते. नाशिक-मुंबई-पुणेकर मंडळी कुटुंबकबिल्यासह येतात. सह्यगिरीच्या कुशीतल्या जलोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. पावसाच्या झिम्माड सरी अंगावर घ्यायच्या. धबधब्यांखाली मस्त भिजायचं. चिंब व्हायचं. निसर्गाच्या कुशीत निवांत पहुडलेल्या टुमदार गावांची छानदार नक्षी बघत स्वतः हरवून द्यायचं, असा रिवाजच आता पडू लागलाय. इथले काही धबधबे तर नुसते पाहायचे, काहींचे तुषार अंगावर घ्यायचे. तर काहींच्या जलधारांत ओलेचिंब भिजायचे. केवढी ही विविधता. तनामनाला सुखावणारी. उल्हासित करणारी! *भंडारदरा धरण उर्फ विल्सन डॅम!* मुंबई-नासिक आणि पुणे या बरोब्बर त्रिकोणातले वर्षा सहलीसाठी एकदम भन्नाट जागा आहे भंडारदरा! एका बाजूला रतनगड, कात्राबाई, पाबरगडाची मोठ्ठी पर्वतरांग तर उत्तरेला कुलंग, मदन आणि अलंग हे दुर्गत्रिकुट आणि शेजारी कळसूबाई. यांच्या मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा अफाट, अथांग जलाशय. पावसाळ्यातला भंडारदरा म्हणजे निसर्गाचा नयनरम्य आविष्कारच! जुलै-ऑगस्ट महिन्यात धरण भरते. कुठून कुठून येणारे अगणित प्रवाह एकात्मतेचे गाणे गात धरणात येऊन मिसळतात. आभाळातली निळाई यावर हुकुमत गाजवीत असते. वाऱ्याच्या जोरदार झोताबरोबर त्या अथांग निळ्याशार दर्यातील लाटा उसळी घेत राहतात. काठावर येऊन आदळतात. तेव्हा चुबुक-चुबुक असा गमतीदार आवाज उठतो. निसर्गवेड्यांची झुंबड सदा येथे उडालेली. चिंता-काळजी, कामधंदा याची बोचकी घरात बांधून ठेऊन हे सारे जणू फुलपाखरे होवून उडताहेत, बागडताहेत! पाण्याचा नाच पाहताहेत. स्वतःदेखील नाचताहेत... दारू पिऊन अचकट विचकट हावभाव करत बीभत्स नाचणारे काही नग मात्र नजरेला खटकत राहतात. *पावसाळ्यातले घाटघर; निसर्गसौंदर्याचा मानबिंदू!* पावसाळ्यातले घाटघर म्हणजे भंडारदर्‍याच्या अभिजात निसर्गसौंदर्याचा मानबिंदूच जणू! घाटघर म्हणजे नगर जिल्ह्याची चेरापुंजीच. दरवर्षी पाच-साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस येथे कोसळतो! म्हणूनच पावसाळ्यातले ओलेचिंब घाटघर पाहणे, हा अवर्णनीय असा अनुभव असतो. धुक्याच्या लाटांमागून लाटा वर येताहेत. कोकणकड्यावर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले की, खाली खोल दरी धुक्याने गच्च भरलेली दिसते. मनाच्या गाभाऱ्यातून आठवणी याव्यात, तसे एकामागून एक तलम धुक्याचे लोट येत असतात. साऱ्या आसमंताला कवेत घेतात. पुढच्या क्षणी धुक्याचा हा नाजूकसा पडदा दूर होतो. पृथ्वीवरचा स्वर्गच जणू आपल्या पुढ्यात उभा आहे. हा खेळ रंगात असताना मधूनच आभाळ टपोऱ्या थेंबानी बरसू लागते. पावसाचे कोसळणे... वाऱ्याचे येणे-जाणे...असे सुरु राहते. वारा-धुके-पाऊस यांचा पाठशिवणीचा खेळ येथे सुरूच असतो. सुसाट, विराट आणि भन्नाट! येथील पाऊस, धुके, ओढे-नाले, झाडं-वेली यांच्याशी आपले चटकन नाते जुळून जाते. चैतन्याचा आंनदोत्सव होण्याचं हेच ते ठिकाण. पावसाचे गाणे इथेच ऐकू येते. निसर्गाचे काव्य इथेच उगम पावते! हे सारे पाहताना, अनुभवताना आपण बेधुंद, बेहोश! इथल्या श्रावणाचा गर्भरेशमी रंग ताजा, टवटवीत आणि हवाहवासा वाटणारा असतो. सगळे काही जुळून आल्याने इंद्रधनुची कमान क्षितिजावर उमटते! सप्तरंगांत सारी सृष्टी न्हावून निघते. नवलाईचे रंग उधळते. पाऊस आत आत पाझरत राहतो. अशा रम्य सायंकाळी कातरवेळी पावसाची गाणी हमखास मनात झिरपतात... लकेरी छेडल्या जातात. रानातील सुंदरता आणि उदारता यांनी आपले अंत:करण भरून जाते! *चित्रकार पाऊस..!* पाऊस म्हणजे सृष्टीचा प्राणसखाच जणू! चैतन्याचा दाता असलेल्या या पावसाच्या आगमनाने बघता-बघता सृष्टीचे रुपडे आपल्या डोळ्यांदेखत बदलून जाते. अवघी सृष्टी आपली कुस बदलते! उजाड, ओसाड-भकासपणा कुठल्या कुठे गेलेला. निसर्ग कात टाकतो. चैतन्याने मोहरतो. चराचर सुखावते. चिंब पावसाने रान आबादानी होते. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी सळसळ सगळीकडे जाणवू लागते. हिरवाईचे ताजे टवटवीत रंग पाऊस भरू लागतो. झाडं-वेलींना नवा तजेला येतो. सारी सृष्टी चैतन्याने जणू मोहरून जाते. तिला आनंदाचे भरतेच येते! असा हा पाऊस म्हणजे सृजनशील चित्रकारच जणू! *भंडारदर्‍याचा पाऊस: उत्तर नगरचा पोशिंदा!* पावसाच्या येण्याची वाट केवळ येथील भूमिपुत्रच पाहतात असे नाही, तर संपूर्ण नगर जिल्हा त्याच्या येण्याकडे, बरसण्याकडे डोळे लावून बसलेला असतो. हा पाऊस म्हणजे केवळ निसर्गाला विलोभनीय रंग, रूप देणारा किमयागारच नाही तर शेती-भाती फुलवणारा, अख्ख्या नगर जिल्ह्यातील चराचरांची तहान भागविणारा, वीजनिर्मिती करणारा, साखर कारखान्यांची चाके फिरती ठेवणारा, शेतमळे फुलविणारा... भंडारदर्‍याचा पाऊस खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याचा 'पोशिंदा'च जणू! *पावसाचे मोजमाप-* अठराव्या शतकापर्यंत या पावसाचे शब्दांत(म्हणजे केवळ विशेषणं वापरून) 'वर्णन' केले जायचे. नक्षत्र आणि त्याचं वाहन यावरून त्याची तीव्रता सांगितली किंवा ठरवली जायची. प्रत्येक नक्षत्राशी निगडीत म्हणी आणि शब्दप्रयोगातून त्याचे वैशिष्ट्य अधोरेखित केले जात असे. ते मोठेच गमतीशीर होते. पुढे एकोणिसावे शतक संपता-संपता तत्कालीन ब्रिटिश सरकारने पावसाला इंचाच्या पट्टीने मोजायला सुरुवात केली. सुरुवातीला केवळ इंचात नोंद घेतली जात असे. फार थोड्या लोकांना याची माहिती असायची. पुढे दशमान पद्धती आली. पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये कळायला लागली. पुढे त्या त्या नदीच्या खोऱ्याचे 'वॉटर अकाउंट' झाले. पाणी अडवण्यास धरणे बांधली गेली. पाण्यावरून राजकारण सुरु झाले. म्हणूनच पावसाच्या आकडेवारीला मोठे महत्त्व आले. याबाबतचा आणखीन एक विशेष मुद्दामहून सांगायला हवा. तो म्हणजे या परिसरातला सर्वसामान्य माणूस देखील ‘पाऊस-साक्षर‘ झालाय. मिलीमीटर किंवा इंचात पावसाचे आकडे तसेच प्रवाह आणि पाण्याचा साठा मोजायला वापरली जाणारी क्युसेक्स आणि 'टीएमसी'ची भाषा पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या ओठाओठांवर असते. दिवसभरात किती पाणी आले किती विसर्ग सोडलाय याचे आकडे लाभक्षेत्रातले लोक करत असतात. राज्यभरात सामान्य माणसांत इतकी जलसाक्षरता क्वचित दिसून येईल. याचं श्रेय इथल्या विविध दैनिकांच्या स्थानिक वार्ताहरांना द्यावे लागेल. *वरूणराजाचे विविध गुणदर्शन!* सन १९०८पासून घाटघरचा पाऊस मोजायला सुरुवात झाली. भंडारदरा येथे १९०९पासून पावसाची नोंद ठेवायला सुरुवात झाली. आधी सांगितल्याप्रमाणे शंभर वर्षांनंतरही येथील पावसाचा स्वभाव बदललेला नाहीये. शतकभरातील आकडेच तर हे बोलताहेत. इथल्या पावसाची रूपेही निरनिराळी. दर कोसांवर भाषा बदलते म्हणतात. इथे दर पाच मैलांवर पावसाची रूपे बदलत जातात. एका अर्थाने पावसाची बदलत जाणारी भाषाच! पश्चिमेकडून जसेजसे पूर्वेकडे जावे तसेतसे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. अगदी तपशीलातच बोलायचे तर अनेकदा नगर जिल्ह्याच्या पश्चिम टोकाच्या घाटघरला जेव्हा बेभान पाऊस कोसळत असतो तेव्हा भंडारदर्‍याला पावसाच्या जोरदार सारी झडत असतात. माळेगावला पावसाची रिमझिम सुरु असते. राजूरला एखादी दुसरी सर येऊन जाते. अकोल्याला केवळ ढगाळ वातावरण असते. तर पूर्वेकडच्या कळस गावात चक्क ऊन पडलेले असते! अकोले तालुक्यातल्या पश्चिम टोकाच्या घाटघरपासून पूर्व टोकाच्या सीमेवरील कळसपर्यंतच्या अडुसष्ट ते सत्तर किलोमीटर अंतरातले वरूणराजाचे हे विविध गुणदर्शन! कुमशेत, पाचनई, पेठेचीवाडी या हरिश्चंद्रगड परिसरातील दुर्गम गावात घाटघर-रतनवाडी असाच किंबहुना याहून मुसळधार पाऊस कोसळतो. तेथील निसर्ग अजून बऱ्यापैकी अनाघ्रात आहे. इथला पाऊसदेखील चिंब भिजण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. अंबित व्हॅलीच्या सदाबहार निसर्गामुळे इथल्या पावसाळी पर्यटनाची मजा काही औरच असते! अलीकडे इथल्या पावसाळी पर्यटनाला बेधुंद, बेभान अतिउत्साही पर्यटकांच्या बेशिस्तीचे ग्रहण लागले आहे ही काळजीची बाब म्हणावी लागेल. ते काहीही असो... ‘भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा!‘ या कविवर्य वसंत बापट यांनी लिहिलेल्या कवितेतील ओळी किती चपखल आहेत... भंडारदरा धरणाच्या परिसरात मिळणारा पावसाळी पर्यटनातला आनंद अन्य कुठेही नाही... (लेखक नगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव येथील शाळेत शिक्षक असून, निसर्ग निरीक्षक आणि छायाचित्रकार आहेत.) मोबाइल - 9422855151 #भंडारदरा #घाटघर #महाराष्ट्र #पर्यटन #सांधण_व्हॅली #धबधबे #जलोत्सव #पावसाळी_पर्यटन #रानभूल #सह्याद्री *...सुप्रभात...**भंडारदऱ्याचा पाऊस!* लेखक : भाऊसाहेब चासकर वैशाख सरता-सरता कळसूबाई-हरिश्चंद्रगडाच्या आसमंतात पश्चिमेकडून भन्नाट वारा वाहू लागतो. पाठोपाठ आकाशात काळे ढगही जमा होऊ लागतात. तळकोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून पाऊस घाटाच्या दिशेने सरकू लागतो. बरसून गेलेली एखादी सर मागोमाग मान्सून येणार असल्याची वर्दी देऊन जाते. ग्रीष्माच्या तापलेल्या उन्हात चांगलीच भाजून निघालेली तांबडी माती जणू याचीच प्रतीक्षा करीत असते! पाठोपाठच कोकणकड्यांवरून पाऊस दाखल होतोही. पाहता-पाहता तो मस्त ताल धरतो. भंडारदर्‍याच्या पावसाला मुळातच एक नाद आहे. लय आणि सूरही आहे! म्हणूनच त्याचे येणे आनंदाचे गाणे होऊन जाते. लहान मोठी शिखरे, डोंगरमाथे जलरंगांच्या विविध छटांमध्ये न्हाऊन निघतात. माहेरी आल्यागत मोसमी पाऊस येथे नादावतो. अवघ्या चराचर सृष्टीशी त्याचे गुज सुरु होते आणि बघता-बघता सह्यगिरीच्या कुशीत थबथबतो अनोखा जलोत्सव! भंडारदर्‍याचा पाऊस म्हणजे सृष्टीला सुखावणारा, आनंदाचे गाणे गाणारा, जगण्याला उभारी देणारा, बळ देणारा, चित्तवृत्ती प्रसन्न करणारा... सर्वांना हवाहवासा वाटणारा! ऋतुचक्र पुढे-पुढे सरकतेय. वर्षामागून वर्षे लोटलीत. भंडारदर्‍याच्या पावसाचा स्वभाव फारसा बदललेला नाहीये. भंडारदर्‍याचा पाऊस पाऊसवेड्यांच्या मनाला मोहिनी घालत त्यांना हिरवे-ओले स्वप्न दाखवीत, आमंत्रण देत आलाय. दर वर्षी त्याच्या येण्याची सारेच आतुरतेने वाट पाहत असतात. कधी तो चातकासारखी वाट पाहायला लावतो. कधी अगदी वेळेवर दाखल होतो. कधी रिमझिम बरसतो. तर कधी बेभान होवून धो-धो कोसळताना भूमिपुत्रांना 'नको नको रे पावसा...!' अशी आर्त विनवणी करायला लावतो. तर असा हा इथला पाऊस. *पावसाळी रानभूल!* पर्वत-शिखरांच्या कानात कुजबुजणारे धुके... सैरावैरा धावणारा उनाड रानवारा आणि जोडीला भन्नाट गारवा... टपोऱ्या थेंबांनी ओघळणारा पाऊस... पर्वत-शिखरांच्या कडेकपारीतून-डोंगर उतारांवरुन उड्या घेत आवेगाने झेपावणारे सहस्रावधी जलधारांचे चंदेरी प्रपात, भंडारदरा धरणाच्या दिशेने खळाळत वाहणारे ओढ्या-नाल्यांचे अगणित प्रवाह... या ओढ्या-नाल्यांचे पाणी पिऊन खपाटीला गेलेल्या भंडारदर्‍याच्या जलाशयाचे पोट भरू लागते. मुळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी आणि कृष्णवंती या पूर्ववाहिनी नद्या दुथडी भरून वाहू लागतात. लालसर विटकरी पाण्याने भातखाचरे तुडुंब भरतात. या भातखाचरांत स्थानिक आदिवासींची चिखलणी आणि आवणीची लगबग सुरु असते. माळरानावर-पठारांवर दाटीवाटीने उगवलेले हिरवे-पोपटी गवत आणि साथीला असतो जीवाला वेडावून टाकणारा तो रानगंध... निसर्गशिल्पांचे देखणे कोंदण लाभलेल्या सह्यगिरीच्या कुशीत आषाढ-श्रावणात असे परिपूर्ण निसर्गचित्रच जणू अवतीर्ण होते! यावं आणि धुंद होवून जावं, असं इथलं हे पावसाळी वातावरण. हा जलोत्सव बघायला, इथल्या या झिम्माड सरीत भिजायला पाऊसवेड्यांची केवढी मोठी झुंबड उडते! *रुपेरी जलधारांचे अगणित प्रपात!* पाऊस कोसळत असतो. वर्षा ऋतू धुंद नि कुंद. आभाळात निळ्या-काळ्या रंगाच्या राशी रचलेल्या. सूर्य जणू वर्षाकालीन रजेवर गेलेला! त्याची किरणे ढगातल्या ढगात विरलेली. नाचरा नाद करीत ओढे-नाले बेलगाम होऊन निघतात. डोंगर कड्यांवरून धबधबे कोसळू लागतात. वसुंधरा, बाहुबली, रंधा, नेकलेस, अम्ब्रेला... मुतखेल, कोलटेंभे, रतनवाडी, साम्रदच्या रस्त्यावर अगणित धबधबे... जिकडे पहावे तिकडे धबधबे! विविध आकाराचे. प्रत्येकाचा आपला निराळा स्वभावविशेष! प्रत्येकाचे गाणे वेगळे, रूप-आकार सारे वेगळे. काही ज्ञानेशांच्या ओवीसारखे ओघळणारे! कुठे भाबडे तर कुठे आक्रमकतेने अंगावर येणारे तुकोबारायांच्या अभंगासारखे! साम्रदच्या सांधण व्हॅलीजवळ कड्यावरून पाण्याचा प्रवाह खाली कोसळतो तेव्हा पश्चिम बाजूने येणारा वारा पाणी हवेत उडवतो. हा रिव्हर्स वॉटरफॉल गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीला धुडकावून उंच हवेत उडतो. हे विलोभनीय दृश्य बघण्यात मौज असते. जीवाशिवाच्या भक्तीभावाने उड्या घेत सारे धबधबे आणि ओहोळ भंडारदरा धरणात आपला शेवट करतात. समर्पित होतात. इथे सह्यगिरीच्या दऱ्याखोऱ्यात वारा आणि धबधबे यांची झटपट भीम-जरासंधाच्या युद्धासारखीच असते. कुठे कुठे तर कड्यावरून कोसळणाऱ्या जलधारांना वारा पुन्हा वर लोटतो. गुरुत्वाकर्षणाला धुडकावून या पाऊसधारा खुशाल काळ्या मेघांत मिसळतात. साम्रदच्या धबधब्याचे ते अपूर्व दृश्य निसर्गाच्या अलौकिक शक्तीची जाणीव करून देते. रतनगड आणि हरिश्चंद्रगडाच्या डोंगरावरील धबधबे तसे काहीसे रांगडेच! यांचा शेवट दिसतो, आरंभ कायमच धुक्यात गुडूप झालेला! जलोत्सव बहरतो तसा रंधा धबधबा पुन्हा तरुण होऊन; अजून यौवनात मी...' असे गाणे म्हणत आपल्याच नादात बेभान होऊन कोसळत असायचा. निळवंडे धरणाचे बॅक वॉटर रंधा धबधब्याला पोटात घेते... त्याच्या चाहत्यांची घोर निराशा होते. नाशिक-मुंबई-पुणेकर मंडळी कुटुंबकबिल्यासह येतात. सह्यगिरीच्या कुशीतल्या जलोत्सवाचा मनमुराद आनंद लुटतात. पावसाच्या झिम्माड सरी अंगावर घ्यायच्या. धबधब्यांखाली मस्त भिजायचं. चिंब व्हायचं. निसर्गाच्या कुशीत निवांत पहुडलेल्या टुमदार गावांची छानदार नक्षी बघत स्वतः हरवून द्यायचं, असा रिवाजच आता पडू लागलाय. इथले काही धबधबे तर नुसते पाहायचे, काहींचे तुषार अंगावर घ्यायचे. तर काहींच्या जलधारांत ओलेचिंब भिजायचे. केवढी ही विविधता. तनामनाला सुखावणारी. उल्हासित करणारी! *भंडारदरा धरण उर्फ विल्सन डॅम!* मुंबई-नासिक आणि पुणे या बरोब्बर त्रिकोणातले वर्षा सहलीसाठी एकदम भन्नाट जागा आहे भंडारदरा! एका बाजूला रतनगड, कात्राबाई, पाबरगडाची मोठ्ठी पर्वतरांग तर उत्तरेला कुलंग, मदन आणि अलंग हे दुर्गत्रिकुट आणि शेजारी कळसूबाई. यांच्या मधोमध विसावलेला भंडारदरा धरणाचा अफाट, अथांग जलाशय. पावसाळ्यातला भंडारदरा म्हणजे निसर्गाचा नयनरम्य आविष्कारच! जुलै-ऑगस्ट महिन्यात धरण भरते. कुठून कुठून येणारे अगणित प्रवाह एकात्मतेचे गाणे गात धरणात येऊन मिसळतात. आभाळातली निळाई यावर हुकुमत गाजवीत असते. वाऱ्याच्या जोरदार झोताबरोबर त्या अथांग निळ्याशार दर्यातील लाटा उसळी घेत राहतात. काठावर येऊन आदळतात. तेव्हा चुबुक-चुबुक असा गमतीदार आवाज उठतो. निसर्गवेड्यांची झुंबड सदा येथे उडालेली. चिंता-काळजी, कामधंदा याची बोचकी घरात बांधून ठेऊन हे सारे जणू फुलपाखरे होवून उडताहेत, बागडताहेत! पाण्याचा नाच पाहताहेत. स्वतःदेखील नाचताहेत... दारू पिऊन अचकट विचकट हावभाव करत बीभत्स नाचणारे काही नग मात्र नजरेला खटकत राहतात. *पावसाळ्यातले घाटघर; निसर्गसौंदर्याचा मानबिंदू!* पावसाळ्यातले घाटघर म्हणजे भंडारदर्‍याच्या अभिजात निसर्गसौंदर्याचा मानबिंदूच जणू! घाटघर म्हणजे नगर जिल्ह्याची चेरापुंजीच. दरवर्षी पाच-साडेपाच हजार मिलीमीटर पाऊस येथे कोसळतो! म्हणूनच पावसाळ्यातले ओलेचिंब घाटघर पाहणे, हा अवर्णनीय असा अनुभव असतो. धुक्याच्या लाटांमागून लाटा वर येताहेत. कोकणकड्यावर पश्चिमेला तोंड करून उभे राहिले की, खाली खोल दरी धुक्याने गच्च भरलेली दिसते. मनाच्या गाभाऱ्यातून आठवणी याव्यात, तसे एकामागून एक तलम धुक्याचे लोट येत असतात. साऱ्या आसमंताला कवेत घेतात. पुढच्या क्षणी धुक्याचा हा नाजूकसा पडदा दूर होतो. पृथ्वीवरचा स्वर्गच जणू आपल्या पुढ्यात उभा आहे. हा खेळ रंगात असताना मधूनच आभाळ टपोऱ्या थेंबानी बरसू लागते. पावसाचे कोसळणे... वाऱ्याचे येणे-जाणे...असे सुरु राहते. वारा-धुके-पाऊस यांचा पाठशिवणीचा खेळ येथे सुरूच असतो. सुसाट, विराट आणि भन्नाट! येथील पाऊस, धुके, ओढे-नाले, झाडं-वेली यांच्याशी आपले चटकन नाते जुळून जाते. चैतन्याचा आंनदोत्सव होण्याचं हेच ते ठिकाण. पावसाचे गाणे इथेच ऐकू येते. निसर्गाचे काव्य इथेच उगम पावते! हे सारे पाहताना, अनुभवताना आपण बेधुंद, बेहोश! इथल्या श्रावणाचा गर्भरेशमी रंग ताजा, टवटवीत आणि हवाहवासा वाटणारा असतो. सगळे काही जुळून आल्याने इंद्रधनुची कमान क्षितिजावर उमटते! सप्तरंगांत सारी सृष्टी न्हावून निघते. नवलाईचे रंग उधळते. पाऊस आत आत पाझरत राहतो. अशा रम्य सायंकाळी कातरवेळी पावसाची गाणी हमखास मनात झिरपतात... लकेरी छेडल्या जातात. रानातील सुंदरता आणि उदारता यांनी आपले अंत:करण भरून जाते! *चित्रकार पाऊस..!* पाऊस म्हणजे सृष्टीचा प्राणसखाच जणू! चैतन्याचा दाता असलेल्या या पावसाच्या आगमनाने बघता-बघता सृष्टीचे रुपडे आपल्या डोळ्यांदेखत बदलून जाते. अवघी सृष्टी आपली कुस बदलते! उजाड, ओसाड-भकासपणा कुठल्या कुठे गेलेला. निसर्ग कात टाकतो. चैतन्याने मोहरतो. चराचर सुखावते. चिंब पावसाने रान आबादानी होते. चित्तवृत्ती प्रसन्न करणारी सळसळ सगळीकडे जाणवू लागते. हिरवाईचे ताजे टवटवीत रंग पाऊस भरू लागतो. झाडं-वेलींना नवा तजेला येतो. सारी सृष्टी चैतन्याने जणू मोहरून जाते. तिला आनंदाचे भरतेच येते! असा हा पाऊस म्हणजे सृजनशील चित्रकारच जणू! *भंडारदर्‍याचा पाऊस: उत्तर नगरचा पोशिंदा!* पावसाच्या येण्याची वाट केवळ येथील भूमिपुत्रच पाहतात असे नाही, तर संपूर्ण नगर जिल्हा त्याच्या येण्याकडे, बरसण्याकडे डोळे लावून बसलेला असतो. हा पाऊस म्हणजे केवळ निसर्गाला विलोभनीय रंग, रूप देणारा किमयागारच नाही तर शेती-भाती फुलवणारा, अख्ख्या नगर जिल्ह्यातील चराचरांची तहान भागविणारा, वीजनिर्मिती करणारा, साखर कारखान्यांची चाके फिरती ठेवणारा, शेतमळे फुलविणारा... भंडारदर्‍याचा पाऊस खऱ्या अर्थाने नगर जिल्ह्याचा 'पोशिंदा'च जणू! *पावसाचे मोजमाप-* अठराव्या शतकापर्यंत या पावसाचे शब्दांत(म्हणजे केवळ विशेषणं वापरून) 'वर्णन' केले जायचे. नक्षत्र आणि त्याचं वाहन यावरून त्याची तीव्रता सांगितली किंवा ठरवली जायची. प्रत्येक नक्षत्राशी निगडीत म्हणी आणि शब्दप्रयोगातून त्याचे वैशिष्ट्य अधोरेखित केले जात असे. ते मोठेच गमतीशीर होते. पुढे एकोणिसावे शतक संपता-संपता तत्कालीन ब्रिटिश सरकारने पावसाला इंचाच्या पट्टीने मोजायला सुरुवात केली. सुरुवातीला केवळ इंचात नोंद घेतली जात असे. फार थोड्या लोकांना याची माहिती असायची. पुढे दशमान पद्धती आली. पडलेल्या पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये कळायला लागली. पुढे त्या त्या नदीच्या खोऱ्याचे 'वॉटर अकाउंट' झाले. पाणी अडवण्यास धरणे बांधली गेली. पाण्यावरून राजकारण सुरु झाले. म्हणूनच पावसाच्या आकडेवारीला मोठे महत्त्व आले. याबाबतचा आणखीन एक विशेष मुद्दामहून सांगायला हवा. तो म्हणजे या परिसरातला सर्वसामान्य माणूस देखील ‘पाऊस-साक्षर‘ झालाय. मिलीमीटर किंवा इंचात पावसाचे आकडे तसेच प्रवाह आणि पाण्याचा साठा मोजायला वापरली जाणारी क्युसेक्स आणि 'टीएमसी'ची भाषा पावसाळ्याच्या दिवसात लोकांच्या ओठाओठांवर असते. दिवसभरात किती पाणी आले किती विसर्ग सोडलाय याचे आकडे लाभक्षेत्रातले लोक करत असतात. राज्यभरात सामान्य माणसांत इतकी जलसाक्षरता क्वचित दिसून येईल. याचं श्रेय इथल्या विविध दैनिकांच्या स्थानिक वार्ताहरांना द्यावे लागेल. *वरूणराजाचे विविध गुणदर्शन!* सन १९०८पासून घाटघरचा पाऊस मोजायला सुरुवात झाली. भंडारदरा येथे १९०९पासून पावसाची नोंद ठेवायला सुरुवात झाली. आधी सांगितल्याप्रमाणे शंभर वर्षांनंतरही येथील पावसाचा स्वभाव बदललेला नाहीये. शतकभरातील आकडेच तर हे बोलताहेत. इथल्या पावसाची रूपेही निरनिराळी. दर कोसांवर भाषा बदलते म्हणतात. इथे दर पाच मैलांवर पावसाची रूपे बदलत जातात. एका अर्थाने पावसाची बदलत जाणारी भाषाच! पश्चिमेकडून जसेजसे पूर्वेकडे जावे तसेतसे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. अगदी तपशीलातच बोलायचे तर अनेकदा नगर जिल्ह्याच्या पश्चिम टोकाच्या घाटघरला जेव्हा बेभान पाऊस कोसळत असतो तेव्हा भंडारदर्‍याला पावसाच्या जोरदार सारी झडत असतात. माळेगावला पावसाची रिमझिम सुरु असते. राजूरला एखादी दुसरी सर येऊन जाते. अकोल्याला केवळ ढगाळ वातावरण असते. तर पूर्वेकडच्या कळस गावात चक्क ऊन पडलेले असते! अकोले तालुक्यातल्या पश्चिम टोकाच्या घाटघरपासून पूर्व टोकाच्या सीमेवरील कळसपर्यंतच्या अडुसष्ट ते सत्तर किलोमीटर अंतरातले वरूणराजाचे हे विविध गुणदर्शन! कुमशेत, पाचनई, पेठेचीवाडी या हरिश्चंद्रगड परिसरातील दुर्गम गावात घाटघर-रतनवाडी असाच किंबहुना याहून मुसळधार पाऊस कोसळतो. तेथील निसर्ग अजून बऱ्यापैकी अनाघ्रात आहे. इथला पाऊसदेखील चिंब भिजण्याचा अनुभव घेण्यासारखा आहे. अंबित व्हॅलीच्या सदाबहार निसर्गामुळे इथल्या पावसाळी पर्यटनाची मजा काही औरच असते! अलीकडे इथल्या पावसाळी पर्यटनाला बेधुंद, बेभान अतिउत्साही पर्यटकांच्या बेशिस्तीचे ग्रहण लागले आहे ही काळजीची बाब म्हणावी लागेल. ते काहीही असो... ‘भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा!‘ या कविवर्य वसंत बापट यांनी लिहिलेल्या कवितेतील ओळी किती चपखल आहेत... भंडारदरा धरणाच्या परिसरात मिळणारा पावसाळी पर्यटनातला आनंद अन्य कुठेही नाही... (लेखक नगर जिल्हा परिषदेच्या वीरगाव येथील शाळेत शिक्षक असून, निसर्ग निरीक्षक आणि छायाचित्रकार आहेत.) मोबाइल - 9422855151 #भंडारदरा #घाटघर #महाराष्ट्र #पर्यटन #सांधण_व्हॅली #धबधबे #जलोत्सव #पावसाळी_पर्यटन #रानभूल #सह्याद्री *...सुप्रभात...*

Sunday, July 6, 2025

राजूरचा समर्थ विधालयाने काढली पायी दिंडी

अकोले,ता.५: आषाढ सरी अंगावर झेलत जय जय रामकृष्ण हरी जयघोषात टाळ मृदुंग निनादात धोतर नेहरू शर्ट वारकरी वेशभूषेत ,नऊवारी घालून समर्थच्या बालचमुनी आज राजूर शहरात पायी दिंडी व गोल रिंगणात आपल्या अध्यात्मिक संस्काराचा वसा एक पाऊल पुढे टाकत जपला यावेळी रसजूर परिसरातील ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपारिक शालेय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . या दिंडी सोहळ्यात सर्व विद्यार्थी शिक्षक भक्ती भावाने सहभागी झाले विद्यार्थी व शिक्षकांनी वारकरी वेष परिधान करून ज्ञानोबा तुकारामांच्या जय घोषात विद्यालयातून दिंडीला सुरुवात केली . या दिंडी सोहळ्याची सुरुवातपालक शिवशंकर व नीता मुतडक यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली .या दिंडी सोहळ्याला ह.भ.प.श्रीराम पन्हाळे यांनी मार्गदर्शन केले . सर्व विद्यार्थी या दिंडी सोहळ्यामध्ये उत्स्फूर्त सहभागी झाले असेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांनी एक आठवण म्हणून एक एक वृक्ष लावावा त्याचे जतन करावे ही तुमची आषाढी एकादशी निमित्त ओळख राहील असे आवाहन केले .त्यानंतर ढोल, ताशा ,टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थिनी अभंग गात लक्ष्मीनारायण मंदिरासमोर ज्ञानोबा तुकाराम यांचे अभंग म्हटले .त्या ठिकाणी मंदिरातील भक्त मुतडक बाबा यांनीही विद्यार्थ्यांसोबत अभंग म्हटले . या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण इयत्ता पाचवीचे विद्यार्थी शिवदीप शिवशंकर मुतडक व नूतन मेंगाळ या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई चा वेष परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .त्यानंतर वारकरी दिंडी मुख्य बाजारपेठेतून विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाची आरती करून समारोप करण्यात आला .या आरती सोहळ्यामध्ये राजूर मधील प्रतिष्ठित व्यापारी प्रदीप बनसोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप केले . दिंडी सोहळा पाहून समाधान व्यक्त केले . शाळेचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगताना ऊन ,वारा पाऊस, तहान भूक यांची तमा न बाळगता माऊली सोबत तुकोबांसोबत वारीत चालत राहतो तो वारकरी . माऊली प्रमाणेच त्याला सुद्धा भेटायचे असते . आपल्या लाडक्या विठुरायाला या दिंडीमध्ये शिस्त ,नियोजन ,सुत्रता बंधुभाव ,विश्वास ,प्रेम, एकता असे एक ना अनेक गुण भाव अनुभवायास मिळतात .येथील प्रत्येक वारकरी तुकोबांच्या गाथेतील एकेक अभंग जगतो आणि अभंग बरोबर हरिनामाच्या गजरात त्याची आळवणी सुद्धा करतो असं वारकऱ्यांच्या मुखातून प्रकट होत होता तोच भाव विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता . त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार रूजावेत हा महत्त्वाचा उद्देश असल्याचे सांगितले . हा सोहळा विद्यार्थ्यांना आध्यात्मिक सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणारा ठरेल असे आपल्या मनोगतातून सांगितले . विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून केळी वाटप केल्याबद्दल प्रदीप बनसोडे यांचा मुख्याध्यापकांनी सत्कार केला या वारकरी सोहळ्यामध्ये विद्यालयातील शिक्षक सतीश काळे ,विनायक साळवे, साहेबराव कानवडे, दगडू टकले ,तानाजी फापाळे, सुनीता पापळ,श्रीनिवास मुळे, जयराम कोकतरे,यांनी सहभाग घेतला

बापू जन्मदिवस

अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून व ३३ वर्षे श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,...