Sunday, July 6, 2025
राजूरचा समर्थ विधालयाने काढली पायी दिंडी
अकोले,ता.५: आषाढ सरी अंगावर झेलत जय जय रामकृष्ण हरी जयघोषात टाळ मृदुंग निनादात धोतर नेहरू शर्ट वारकरी वेशभूषेत ,नऊवारी घालून समर्थच्या बालचमुनी आज राजूर शहरात पायी दिंडी व गोल रिंगणात आपल्या अध्यात्मिक संस्काराचा वसा एक पाऊल पुढे टाकत जपला यावेळी रसजूर परिसरातील ग्रामस्थ पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपारिक शालेय दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले . या दिंडी सोहळ्यात सर्व विद्यार्थी शिक्षक भक्ती भावाने सहभागी झाले विद्यार्थी व शिक्षकांनी वारकरी वेष परिधान करून ज्ञानोबा तुकारामांच्या जय घोषात विद्यालयातून दिंडीला सुरुवात केली .
या दिंडी सोहळ्याची सुरुवातपालक शिवशंकर व नीता मुतडक यांच्या हस्ते विठ्ठलाच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली .या दिंडी सोहळ्याला ह.भ.प.श्रीराम पन्हाळे यांनी मार्गदर्शन केले . सर्व विद्यार्थी या दिंडी सोहळ्यामध्ये उत्स्फूर्त सहभागी झाले असेच वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांनी एक आठवण म्हणून एक एक वृक्ष लावावा त्याचे जतन करावे ही तुमची आषाढी एकादशी निमित्त ओळख राहील असे आवाहन केले .त्यानंतर ढोल, ताशा ,टाळ मृदुंगाच्या गजरात विद्यार्थिनी अभंग गात लक्ष्मीनारायण मंदिरासमोर ज्ञानोबा तुकाराम यांचे अभंग म्हटले .त्या ठिकाणी मंदिरातील भक्त मुतडक बाबा यांनीही विद्यार्थ्यांसोबत अभंग म्हटले .
या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण इयत्ता पाचवीचे विद्यार्थी शिवदीप शिवशंकर मुतडक व नूतन मेंगाळ या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई चा वेष परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले .त्यानंतर वारकरी दिंडी मुख्य बाजारपेठेतून विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन विठ्ठलाची आरती करून समारोप करण्यात आला .या आरती सोहळ्यामध्ये राजूर मधील प्रतिष्ठित व्यापारी प्रदीप बनसोडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप केले . दिंडी सोहळा पाहून समाधान व्यक्त केले .
शाळेचे मुख्याध्यापक किरण भागवत यांनी उपक्रमाचे महत्त्व सांगताना ऊन ,वारा पाऊस, तहान भूक यांची तमा न बाळगता माऊली सोबत तुकोबांसोबत वारीत चालत राहतो तो वारकरी . माऊली प्रमाणेच त्याला सुद्धा भेटायचे असते . आपल्या लाडक्या विठुरायाला या दिंडीमध्ये शिस्त ,नियोजन ,सुत्रता बंधुभाव ,विश्वास ,प्रेम, एकता असे एक ना अनेक गुण भाव अनुभवायास मिळतात .येथील प्रत्येक वारकरी तुकोबांच्या गाथेतील एकेक अभंग जगतो आणि अभंग बरोबर हरिनामाच्या गजरात त्याची आळवणी सुद्धा करतो असं वारकऱ्यांच्या मुखातून प्रकट होत होता तोच भाव विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता . त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाचे संस्कार रूजावेत हा महत्त्वाचा उद्देश असल्याचे सांगितले . हा सोहळा विद्यार्थ्यांना आध्यात्मिक सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणारा ठरेल असे आपल्या मनोगतातून सांगितले . विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून केळी वाटप केल्याबद्दल प्रदीप बनसोडे यांचा मुख्याध्यापकांनी सत्कार केला
या वारकरी सोहळ्यामध्ये विद्यालयातील शिक्षक सतीश काळे ,विनायक साळवे, साहेबराव कानवडे, दगडू टकले ,तानाजी फापाळे, सुनीता पापळ,श्रीनिवास मुळे, जयराम कोकतरे,यांनी सहभाग घेतला
Subscribe to:
Post Comments (Atom)
राजूरचा समर्थ विधालयाने काढली पायी दिंडी
अकोले,ता.५: आषाढ सरी अंगावर झेलत जय जय रामकृष्ण हरी जयघोषात टाळ मृदुंग निनादात धोतर नेहरू शर्ट वारकरी वेशभूषेत ,नऊवारी घालून समर्थच्या बालचम...

-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...
-
अकोले,ता.५: आषाढ सरी अंगावर झेलत जय जय रामकृष्ण हरी जयघोषात टाळ मृदुंग निनादात धोतर नेहरू शर्ट वारकरी वेशभूषेत ,नऊवारी घालून समर्थच्या बालचम...
No comments:
Post a Comment