Tuesday, July 7, 2026

पश्चिम अकोल्यात अतिवृष्टीचा कहर; तीन तलाव ओव्हरफ्लो, भंडारदरा ५० टक्के तर मुळा धरणात झपाट्याने वाढ

 चौकट - भंडारदरा पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरू असून  भंडारदरा जलाशयात  ५६०४ (५०.७६%) दशलक्ष घनफुट साठा असून पन्नास टक्के जलाशय भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱयानी समाधान व्यक्त केले आहे तर वाकी जलाशयातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने रंधा धबधबा अवतीर्ण झाला असून कोदणी वीज प्रकल्प (३४  मेगावाट )सुरू होऊन वीज निर्मिती चालू झाली आहे .मथळा :

पश्चिम अकोल्यात अतिवृष्टीचा कहर; तीन तलाव ओव्हरफ्लो, भंडारदरा ५० टक्के तर मुळा धरणात झपाट्याने वाढ

Writing

अकोले, ता. ७ : तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून तीन लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागले आहेत. टिटवी (३०३.३२ दलघफू), देवहांडी-शिरपुंजे (९४.८० दलघफू) आणि कोथळे (१८२ दलघफू) हे तलाव ओव्हरफ्लो झाले असून भंडारदरा धरण ५०.७६ टक्के भरले आहे. मुळा नदीला मध्यम स्वरूपाचा पूर आल्याने मुळा धरणातील पाणीसाठाही २९.५८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

गेल्या चोवीस तासांत घाटघर येथे तब्बल ३२१ मिमी (सुमारे १३ इंच) तर रतनवाडी येथे ३०२ मिमी (सुमारे १२ इंच) पावसाची नोंद झाली. सततच्या अतिवृष्टीमुळे कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसर गारठून गेला असून डोंगरकड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांसह ओढ्यांनीही रौद्ररूप धारण केले आहे.

हरिश्चंद्रगड पर्वतरांगांतील पावसामुळे मुळा नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. कोतुळजवळ सकाळी १३ हजार ८३६ क्युसेक असलेला विसर्ग दुपारी तीनपर्यंत वाढून ३७ हजार ८७५ क्युसेकवर पोहोचला. केवळ बारा तासांत मुळा धरणात ४६७ दलघफू पाण्याची आवक झाली.

पुराच्या पाण्यामुळे लहित खुर्द येथील मुळा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने लहित खुर्द आणि लहित बुद्रुक या गावांतील संपर्क तुटला आहे. कोतुळ येथील प्राचीन कोटुळेश्वर महादेव मंदिरही सुमारे पाच फूट पाण्याखाली गेले आहे. कोतुळ व ब्राम्हणवाडा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले, तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटातही अतिवृष्टी कायम असून गेल्या चोवीस तासांत धरणात एक टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची आवक झाली. सायंकाळपर्यंत
























































धरणातील पाणीसाठा ५,६०४ दलघफू (५०.७६ टक्के) झाला होता.

प्रवरा खोऱ्यातील वाकी पाठोपाठ टिटवी तलावही भरून वाहू लागल्याने निळवंडे धरणातील आवकेत वाढ झाली आहे. निळवंडे धरणातील पाणीसाठा सायंकाळपर्यंत २,११६ दलघफू (२५.३८ टक्के) नोंदविण्यात आला.

दरम्यान, सततच्या पावसामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. जनावरे घरातच बांधून ठेवावी लागत असून परिसरात थंडीचे वातावरण निर्माण झाले आहे. उबेसाठी अनेक ठिकाणी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे. भाताची खाचरे तुडुंब भरली असून अनेक ठिकाणी भाताची रोपे वाहून गेली किंवा सडली आहेत. पाऊस ओसरल्यानंतर शेतीच्या नुकसानीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.

पश्चिम अकोल्यात अतिवृष्टीचा कहर; तीन तलाव ओव्हरफ्लो, भंडारदरा ५० टक्के तर मुळा धरणात झपाट्याने वाढ

 चौकट - भंडारदरा पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरू असून  भंडारदरा जलाशयात  ५६०४ (५०.७६%) दशलक्ष घनफुट साठा असून पन्नास टक्के जलाशय भरल्यान...