maharashtra times akole taluka
Monday, April 27, 2026
बापू निर्भीड पत्रकार
पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील समर्पित कार्य यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. पत्रकार म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील समस्या, जनतेचे प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक घडामोडींना सातत्याने वाचा फोडण्याचे काम केले आहे. वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि जनसामान्यांच्या बाजूने उभे राहणारे पत्रकार म्हणून त्यांनी विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
शांताराम काळे यांनी केवळ पत्रकारितेपुरते कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना चालना देणे, तसेच युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
स्वामी समर्थ शिक्षण संस्था, राजूरचे सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि संस्कारमूल्ये देण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक उपक्रम राबवले. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली असून पालक, विद्यार्थी आणि समाजात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. पत्रकारिता आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे शांताराम काळे हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जाते.
बापू परिचय
पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील समर्पित कार्य यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. पत्रकार म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील समस्या, जनतेचे प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक घडामोडींना सातत्याने वाचा फोडण्याचे काम केले आहे. वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि जनसामान्यांच्या बाजूने उभे राहणारे पत्रकार म्हणून त्यांनी विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे.
शांताराम काळे यांनी केवळ पत्रकारितेपुरते कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना चालना देणे, तसेच युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
स्वामी समर्थ शिक्षण संस्था, राजूरचे सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि संस्कारमूल्ये देण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक उपक्रम राबवले. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.
त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली असून पालक, विद्यार्थी आणि समाजात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. पत्रकारिता आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे शांताराम काळे हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जाते.
Saturday, April 25, 2026
Tuesday, September 23, 2025
चिंचोडी ग्रामसेवक मेडिकल रजेवर असतानाही चेकवर सह्या करून पैसे काढले
Sunday, September 21, 2025
हरिश्चंद्रगड चा कास पठार फुलला
हरिश्चंद्रगड चा कास पठार फुलला
अकोले,ता.२१:हरिश्चंद्रगड रानफुलांनी बहरलाय मग कधी भेट देताय.
आपल्या लाडक्या हरिश्चंद्र गडाला,आम्ही आहोतच तुमच्या स्वागताला.असे फ्लेक्स बोर्ड स्थानिक व्यवसायिक लावून पर्यटकाना व निसर्ग प्रेमीना साद घालत आहेत।
पावसाळा सुरु झाला की सह्याद्रीच्या पठारावर डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातीची ,रंगांची, आकाराची ही फुल आपल लक्ष वेधुन घेतात. सप्टेंबर अखेर पर्यंत त्या फुलांची चादर सर्वदुर पसरलेली दिसायला लागते. काही तासांच ते दिवसांच आयुष्य असलेली ही फुल डोंगर भटके आणि अभ्यासकांपुढे आपल भांडार उघड करतात. सह्याद्रीतील फुल म्हटली की सर्वांच्या नजरेसमोर पहिल्यांदा येत ते हरिसचंद्रगड पुष्प पठारावर पाउस पडायला लागला की दर महिन्यात वेगवेगळी फ़ुल फ़ुलायला लागतात. पणपाऊस पडायला सुरुवात झाली की जमिनीवर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फ़ुटायला लागतात. जमिन हिरवीगार दिसायला लागते. पाउस पडल्या - पडल्या सर्वप्रथम हजेरी लावतात ती पाण कुसुमची फ़ुल. त्यानंतर काळी मुसळीची चांदणी सारखी दिसणारी पिवळी फ़ुल हजेरी लावतात. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ती मुळासकट उपटली जातेय. मग येते आषाढ आमरी, आमरी म्हणजे इंग्रजीत ऑर्किड. ती येते तेंव्हा गवत जास्त वाढलेल नसते त्यामुळे त्याची पांढरी सुंदर फ़ुल त्या हिरव्या गालिच्यावर उठुन दिसतात. एकदा एका पावसाळी संध्याकाळी एका पठारावर विसावलेलो. पावसामुळे वातावरण कुंद होत. संध्याकाळच्या कमी होत जाणार्या प्रकाशात गवताच्या वर डोलवणार्या दांड्यांमधुन आषाढ आमरीची फ़ुल फ़ुलायला लागली आणि काही वेळातच ते पठार त्या पांढर्या फ़ुलांनी चमकायला लागल. या फ़ुलांमधे पण गमती जमती असतात. पाउस पडल्यावर "हबे आमरीच्या" कंदातुन एक दांडा बाहेर येतो त्यावर पांढरी फ़ुल येतात. त्यानंतर त्याला जमिनी लगत एकच मोठ पान येत. परागीभवन झाल की फ़ुल गळुन पडतात. पानात तयार झालेल अन्न कंदात साठवल जाते ते पुढच्या पावसाळ्यासाठी. ऑगस्ट, सप्टेंबर मधे तेरड्याची फ़ुल आणि सोनकीने सह्याद्रीची पठार झाकली जातात, रस्त्यांच्या कडेला, दाट झाडीत जागा मिळेल तिथे पेवची बेट फ़ुलायला लागतात. हा पुष्प सोहळा सह्याद्रीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत चालु असतो.
कोट - आमच्या हरिसचंद्रगड पठार बेटावर नवरात्रीच्या स्वागतसाठी पिवळीधमक सोनकीने पठाराची शोभा वाढवली आहे .तिच्याबरोबरच गुलाबी,निळसर,पांढरी विविधरंगाची व विविध नावाची फुले तिला साथ देत आहे .तेव्हा पर्यटकांनी निसर्गप्रेमींना एकदा हरिशचंद्र गड परिसराला भेट दयावी
भास्कर बादड (सरपंच पाचनई)
Wednesday, August 6, 2025
बापू जन्मदिवस
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ४० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून व ३३ वर्षे श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे त्यांनी शाळाबाह्य होऊ नये ही मनात; उर्मी असणारे शांताराम बापू काळे यांचा ५९वा वाढदिवस; आज ५ऑगष्ट २०२४ रोजी आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच राजूर येथिललक्ष्मण काळे गुरुजी व गंगुबाई यांचे ते चिरंजीव ५बहिणी ३भाऊ असे त्यांचे कुटुंब वडील शिक्षक त्यांना तोटका पगार त्यामुळे इयत्ता सातवी पासून बापू रोजगाराच्या शोधात कधी दुष्काळी कामावर तर कधी बाजारहाट ,यात्रा,मध्ये किराणा मालाची विक्री तर कधी फोटो स्टुडियो मध्ये काम त्यांनी कामाची कधी लाज बाळगली नाही सतत काम व शिक्षण घेत त्यांनी सायकलवर वृत्तपत्र विक्रीचे काम केले त्यातून शिक्षण घेतले तर विमा विकास अधिकारी उत्तम जगधने यांनी त्यांची जिद्द व चिकाटी पाहून त्यांना विमा प्रतिनिधी केले त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली तर वृत्तपत्र विक्री करताना पत्रकारिता देखील त्यांनी सुरू केल्याने विमा व्यवसायातून आर्थिक प्रश्न मार्गी लागले तर पत्रकारितेतून सामाजिक बांधिलकी चे संस्कार रुजवत त्यांचा अविरत पणे प्रवास सुरु झाला तो आजपर्यंत न थकता पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक ,दूध उत्पादक,बेरोजगारी, अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला; प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी पदावर तर काही व्यवसायात प्रवीण आहेत श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी १९९२ ला मुलींचे विधालय सुरु केले तर इंग्रजी शाळा , उच्च माध्यमिक विधालय , हरीशचंद्र गडाच्या पायथ्यशी मवेशी या गावात विधालय सुरु करून तेथील विधार्थी राज्य व देश पातळीवर चमकविले ३६ कर्मचारी त्याच्या संस्थेत काम करीत असून अनेक अडचणी, खोटे आरोप; व संकटे आजही अंगावर घेत त्याचा प्रवास सुरु आहे . माजी मंत्री मधुकर पिचड हे त्याच्या कामाचे नेहमी कौतुक करतात .; कुणावरही व कोणताही प्रसंग असू ते मदतीला धावून जातात हा त्याचा स्थायी स्वभाव आहे; ठाकरवाडी येथील आदिवासी गतिमंद महिला बिट्टी,तिचा दोन वर्षांचा मुलगा यांच्या जीवनावर प्रकाश झोत टाकून त्यांच्या जगण्याचे सार्थक केले तर बांगर वाडी येथील वृद्ध महिलेस सरकारी पेन्शन सुरू केली,कौठवाडी येथील वनिता भांगरे हिची शिक्षणासाठी पायपीट हे वृत्त प्रसिद्ध करून महाराष्ट्रातून मदतीचा ओघ येऊन हे कुटुंब सावरलेआज वनिताचे वडील परबत आई; भामाबाई यांना सरकारी पेन्शन सुरू असून कुटुंबाला घरकुल मिळाले आहे .तर वनिताला मोफत नर्सिंग साठी प्रवेश मिळाला आहे रतनवाडी येथील सोनाली ही फुले विकणारी मुलगी माजी प्राध्यापक रावसाहेब मोरे यांच्या दातृत्व गुणांच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिक्षणाच्या प्रवाहात आली .हे सर्व बापू मुळे झाले हे विशेष बापू तर हे एक वादळ आहे . या वादळाला क्षमविण्याचे काम म्हणजे शांत करण्याचे काम आमच्या वहिनी सौ . मंजुषाताई काळे करतात त्या प्राचार्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विधालयात सेवेत असून त्याने गरीब आदिवासी मुलींना दत्तक पालक योजनेतून शिक्षणाचे कवाडे उघडून दिली आहेत; बापूना; गेली ३२ वर्षे खंबीरपणे साथ देणाऱ्या व समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून समर्पित जीवन जगणाऱ्या या उभयंतास; नगर जिल्हा तेली समाजच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ...त्याचे भावी आयुष्य आरोग्यदायी व सुख समाधानाचे जावो ... अनिल काळे
Subscribe to:
Comments (Atom)
बापू निर्भीड पत्रकार
पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील समर्पित कार्य यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. पत्रकार म्हणून त्यांनी ग्रामीण भा...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...
