Saturday, May 30, 2026

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कोंभाळणे गावाविषयी मनोगत











 

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कोंभाळणे गावाविषयी मनोगत







 

पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कोंभाळणे गावाविषयी मनोगत

 “माझे पाय मातीतच राहणार...”


पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचे कोंभाळणे गावाविषयी मनोगत


अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे हे गाव आज जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. मात्र, या यशानंतरही “माझे पाय मातीतच राहणार,” असे ठामपणे सांगणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या मनात आजही आपल्या गावाविषयी तितकाच जिव्हाळा आहे. बीजमाता म्हणून देशभर ओळख निर्माण करणाऱ्या राहीबाई आपल्या प्रत्येक यशाचे श्रेय गाव, गावकरी आणि निसर्गाला देतात.


“माझं माहेर आणि सासर दोन्ही कोंभाळणेच. माझं संपूर्ण आयुष्य या गावात गेलं. गावातली माणसं आजही कोठेही गेली की अभिमानाने सांगतात, ‘आम्ही पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे गावचे आहोत.’ हीच माझी खरी कमाई आहे,” असे त्या सांगतात.


जंगलाच्या कुशीत वाढलेल्या राहीबाईंचं बालपण अत्यंत संघर्षमय होतं. सात बहिणी आणि एक भाऊ अशा मोठ्या कुटुंबात लहानपणीच आईचं छत्र हरपलं. वडिलांनीच आईची माया देत संसार आणि मुलांचा सांभाळ केला. “गरिबीने लाजू नये; चांगल्या कामात मरून निघायचं पण सरून निघायचं नाही,” ही वडिलांची शिकवण आयुष्यभर सोबत राहिल्याचं त्या आवर्जून सांगतात.


अत्यंत हालअपेष्टांत बालपण गेले. जंगलातून सरपण गोळा करणे, मोळ्या विकणे, शेतीकाम, घरकाम या सगळ्या जबाबदाऱ्या लहान वयातच त्यांच्या खांद्यावर आल्या. शिक्षणाचा गंधही नव्हता. देवळात भरायच्या शाळेतील एक प्रसंग त्या आजही विसरलेल्या नाहीत. “गुरुजींनी मारल्यामुळे मला शाळेची भीती वाटली आणि मी पुन्हा कधीच शाळेत गेले नाही,” असे सांगताना त्यांच्या आवाजात आजही वेदना जाणवतात.


वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. संसार, मुलं, शेती आणि संघर्ष यात आयुष्य पुढे सरकत राहिलं. “मुलांना पाठीवर बांधून शेतात काम केलं. गरिबीतही आम्ही आनंदाने जगलो,” असे त्या सांगतात. आजही त्या आपल्या संघर्षाकडे खंत म्हणून नव्हे, तर ताकद म्हणून पाहतात.


कोंभाळणे गावाची ओळख पूर्वी कुस्तीपटूंमुळे होती. गावातील अनेक पहिलवानांनी पंचक्रोशीत नाव कमावले. “त्यांनी गाव सोडलं नाही, याचाही अभिमान वाटतो,” असे त्या सांगतात. पुढे देशी बियाण्यांच्या जतनासाठी केलेल्या कार्यामुळे राहीबाईंची ओळख देशभर पोहोचली. केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.


मात्र, इतकी मोठी ओळख मिळूनही राहीबाईंची मातीशी असलेली नाळ तुटलेली नाही. “आम्ही जंगलचे राजे आहोत. यापेक्षा मोठी पदवी कोणती?” असे त्या अभिमानाने म्हणतात.


गाव बदलत असले तरी आदिवासी भागातील समस्या मात्र कायम असल्याची खंत त्या व्यक्त करतात. “दवाखाना आहे पण उपयोग नाही. पाणी आठ-आठ दिवस येत नाही. रस्त्यांची कामं वर्षानुवर्षे अपूर्ण आहेत. लोक आजारी पडतात. आम्ही कसं जगायचं ते सरकारने सांगावं,” असा सवाल त्या करतात.


“देशात भव्य विकास होतोय, पण आदिवासी भागाकडे अजूनही दुर्लक्ष होत आहे. किमान प्राथमिक गरजा तरी पूर्ण करा आणि आम्हाला माणसासारखं जगू द्या,” अशी आर्त मागणी राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केली.


(शब्दांकन : शांताराम काळे)

Thursday, May 21, 2026

लग्न वाढदिवस

प्रिय अहो, आज आपल्या लग्नाला ३४ सुंदर वर्ष पूर्ण झाली… ही ३४ वर्ष म्हणजे फक्त काळाचा प्रवास नाही, तर प्रेम, विश्वास, साथ, समजूतदारपणा आणि असंख्य आठवणींनी सजलेला आपल्या नात्याचा अमूल्य खजिना आहे. ❤️ जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझा हात घट्ट धरून उभे राहिलात… सुखात हसवलंत, दुःखात धीर दिलात आणि प्रत्येक क्षणी जाणवून दिलंत की — “खरं प्रेम हे शब्दांत नसतं, तर सोबत निभावण्यात असतं.” तुमच्यासोबतचा प्रत्येक दिवस मला नवीन प्रेरणा देतो. तुमचं प्रेम, तुमची काळजी आणि तुमचा निस्वार्थ स्वभाव हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं भाग्य आहे. 💕 आज आपल्या ३४ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाकडे एकच प्रार्थना — आपलं हे नातं असंच प्रेमाने, विश्वासाने आणि आनंदाने फुलत राहो… 🌸 लग्नाच्या ३४ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… तुम्ही आहात म्हणून माझं आयुष्य इतकं सुंदर आहे… आणि पुढचं प्रत्येक वर्षही तुमच्यासोबतच जगायचं आहे. ❤️

Tuesday, May 19, 2026

मजुषा वाढदिवस

सहजीवनाची शिल्पकार प्रेमाचा झरा त्यागाची मूर्ती ममतेची सावली कर्तृत्ववान अर्धांगिनी संघर्षातील दीपस्तंभ आयुष्याची सोनेरी साथ,जीवनाची प्रेरणा आनंदाची सावली सुखदुःखाची सोबती प्रेमाची मूर्ती आज माझ्या,अर्धांगिनी, जीवनसाथीचा, सौ. मंजुषा काळे हिचा वाढदिवस… २० मे १९७१ रोजी जन्मलेली मंजुषा माझ्या आयुष्यात १० मे १९९२ रोजी आली आणि आयुष्यालाच नवी दिशा मिळाली. पुण्यासारख्या शहरात बालपण गेलेल्या या मुलीने राजूरसारख्या खेड्यात संसाराची सुरुवात केली. बी.ए. पूर्ण झाल्यानंतर लग्न झाले, पण शिक्षणाची जिद्द मात्र कायम ठेवली. संसाराचा गाडा हाकताना डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरणे असो, किराणा साहित्याचे पॅकिंग असो किंवा घरातील प्रत्येक जबाबदारी हसत स्वीकारणे असो… कोणत्याही कामाची तिने कधी लाज बाळगली नाही. प्रपंचाला हातभार लावत तिने बी.एड., एम.ए., एम.एड. आणि व्यवस्थापन पदविका पूर्ण केली. आज ती राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची यशस्वी प्राचार्या म्हणून कार्यरत आहे. स्वप्नील आणि ऋषीकेश या दोन मुलांवर उत्तम संस्कार करत तिने आईपणही तितक्याच समर्थपणे जपले. गेली ३४ वर्षे संसार करताना अनेक चढ-उतार आले, पण तिच्या जिद्दीने, संयमाने आणि कष्टाने प्रत्येक संकटावर मात केली. आज अनेक पुरस्कारांनी सन्मानित होत असतानाही तिची पावले अजूनही गोरगरीब मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धावत आहेत. वयाचे अर्धशतक पार करूनही तिची उर्मी, कामावरील निष्ठा आणि समाजासाठीची तळमळ आजही तितकीच प्रेरणादायी आहे.माझ्या भाऊ बहिणी,भाचे नातेवाईक यांना एकत्र ठेवून त्यांची काळजी घेऊन त्यांच्या मनात घर करणारी..... माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या सहचारिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुझे आयुष्य निरोगी, आनंदी आणि यशस्वी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… 🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंजुषा! 💐

डोंगराची काळी मैना बाजारात

अकोले, ता. १९ : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या रानमेव्याची चाहूल लागली असून डोंगरची ‘काळी मैना’ म्हणून ओळख असलेल्या करवंदांनी राजूर परिसरातील बाजारपेठ गजबजू लागली आहे. रंधा, माळेगाव, घाटघर, शिंगणवाडी, रतनवाडी आदी डोंगराळ भागातील करवंदांच्या जाळ्या काळ्याभोर फळांनी लगडल्या असून उन्हाळ्यातील हा आंबट-गोड रानमेवा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये एप्रिल-मे महिन्यात करवंदांचा हंगाम सुरू होतो. यंदा मात्र वैशाख सुरू होऊनही करवंदे उशिरा पिकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्राबाबत आदिवासी बांधवांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. काही जण यंदा पावसालाही उशीर होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. शाळांना सुट्ट्या लागल्याने अनेक आदिवासी मुले पहाटेपासून जंगलाची वाट धरत आहेत. पाटीभर करवंदे गोळा करून राजूर बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याचा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला आहे. पळस किंवा चांद्याच्या पानांचे डोमे तयार करून राजूर बसस्थानक परिसरात ‘करवंद घ्या... करवंद...’ अशी हाक देत ही चिमुकली विक्री करताना दिसत आहेत. भंडारदरा, हरिश्चंद्रगड किंवा रंधा धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांभोवतीही ही मुले गर्दी करत असल्याचे चित्र आहे. एका डोम्याची किंमत पाच ते दहा रुपये असून दिवसभरात शंभर ते दीडशे रुपयांची विक्री होत असल्याचे मुलांनी सांगितले. शाळा सुरू झाल्यावर नवीन वह्या, पुस्तके आणि गणवेश घेण्यासाठी हे पैसे उपयोगी पडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही मुले घरखर्चाला हातभार लावण्यासाठीही करवंद विक्री करत आहेत. रंधा, माळेगाव, केळुंगण, घाटघर, शिंगणवाडी, मुरशेत, बारी, रतनवाडी, कोलटेंभे या भागात करवंदांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र या रानमेव्याला स्थानिक बाजारपेठेपलीकडे फारसा पर्याय उपलब्ध नाही. राहाता, शिर्डी, राहुरी, कोल्हार, संगमनेर परिसरातील व्यापारी अल्प दराने करवंद खरेदी करत असल्याने आदिवासी बांधवांना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. आदिवासी महामंडळाने करवंद खरेदीसाठी पुढाकार घेत योग्य हमीभाव दिल्यास आदिवासी भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. आकर्षक पॅकिंगद्वारे पुणे, मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत करवंद पोहोचल्यास ‘डोंगरची काळी मैना’ ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान, काही ठिकाणी डोंगरांना लागणाऱ्या आगीमुळे करवंदांच्या जाळ्या नष्ट होत असल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. वनविभागाने करवंदाच्या झाडांचे संवर्धन व संगोपनासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Wednesday, May 13, 2026

माझे गाव आमदार लहामटे

अकोले,ता.१३:आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दैनिक सकाळ प्रतिनिधींशी बोलताना आपल्या गावाची महती इतिहास लोक संस्कृती सांगताना ते म्हणाले माझं गाव हरिशचंद्र गडाच्या कुशीत वसलेले लव्हाळी हे गाव आजूबाजूला सह्याद्रीच्या मोठं मोठ्या लांबच लांब पर्वत रांगा असणारा अतिदुर्गम आदिवासी परिसर सुरुवातीच्या काळात माझ्या या जन्म गावात लहानपण गेले या गावात रांगलो, खेळलो,धावलो शिकलो नंतर शिक्षणासाठी साकिरवाडी येथे गेलो राजूर हे गाव माझी कर्मभूमी मात्र जननी जन्मोभूमी स्वर्गापेक्षा सुंदर आहे .हरिशचंद्र गड परिसरातील लव्हाळी गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे .पूर्वी इथे रस्ते,वीज,पाणी याची सोय नव्हती ,मातीची व कौलारू घरे होती,ही घरे पावसाळ्यात गळू नये म्हबून चाळून घेतली जायची फुटलेली कौले बदलून नव्याने कौले टाकली जायची असा या गावात माझा जन्म झाला वडील शाळा मास्तर, आई शेती व घरकाम करायची २भाऊ१बहीण व मी असा आमचा परिवार गावातील लोक भोळी भाबडी ,सुतार,लोहार न्हावी,तेली,शिंपी ,परीट असा बारा बलुतेदारसमाजाचा गावाशी नेहमी संपर्क असायचा पावसाळ्यापूर्वी सुतार बाबा यायचा शेतीचे लाकडी काम करून द्यायचा, लोहार बाबा शेतीचे लोखंडी अवजारे नांगर,विळे, कोयते,कुऱ्हाड, करून द्यायचा तर परीट घोड्यावर येऊन कपडे ,गोधड्या धुऊन द्यायचा तेली चार महिने पुरेल इतके तेल तर वंजारी बोंबील ,मांदिले देऊन जायचा व चारमहिन्यांनी पीक आल्यावर धान्य रूपाने बिदागी घेऊन जायचे : “जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही सुंदर असते, याचा प्रत्यय मला माझ्या लव्हाळी गावाकडे पाहिल्यावर आजही येतो,” अशा भावनिक शब्दांत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दैनिक सकाळ प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेल्या आपल्या जन्मगावाची महती, इतिहास आणि लोकसंस्कृती उलगडून सांगितली. “सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांनी वेढलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लव्हाळी गावात माझे बालपण गेले. याच मातीत मी रांगलो, खेळलो, धावलो आणि शिकलो. पुढे शिक्षणासाठी साकिरवाडी येथे गेलो, तर राजूर ही माझी कर्मभूमी ठरली,” असे ते म्हणाले. लव्हाळी गावाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी गावात रस्ते, वीज आणि पाण्याच्या सुविधा नव्हत्या. मातीची आणि कौलारू घरे हेच गावाचे वैशिष्ट्य होते. पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी केली जाई. फुटलेली कौले बदलून नवीन कौले टाकली जात. “अशा साध्या, संघर्षमय वातावरणात माझा जन्म झाला. वडील शाळामास्तर होते, तर आई शेती आणि घरकाम सांभाळत होती. दोन भाऊ, एक बहीण आणि मी असा आमचा परिवार होता,” असे त्यांनी सांगितले. गावातील सामाजिक रचनेविषयी बोलताना त्यांनी बारा बलुतेदार पद्धतीची आठवण सांगितली. “सुतार बाबा शेतीची लाकडी कामे करायचे, लोहार बाबा नांगर, विळे, कोयते, कुऱ्हाडी तयार करून द्यायचे. परीट घोड्यावर येऊन कपडे व गोधड्या धुऊन द्यायचा. तेली वर्षभर पुरेल इतके तेल आणून द्यायचा, तर वंजारी बोंबील व मांदेली देऊन जायचा. चार महिन्यांनंतर पीक आल्यानंतर त्यांना धान्यरूपाने बिदागी दिली जायची,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनपद्धतीचे जिवंत चित्र उभे केलेवाघ बारसं हा सण आमचे गावात फार महत्वाचा सण या दिवशी आम्ही मुले निघायचो अगोदर जंगलातील लाकडे गोळा करून चूल पेटवायचो त्यात मोठे भगुले ठेवून त्यात भाताची खीर बनवायचो मग नदीच्या काठावर जाऊन अंघोळ करून आमच्यातील एक वाघ्या व्हायचा त्याला आम्ही मुले भाताचे छोटे गोळे करून मारायचो सूर पारंब्या खेळत दिवस मावळतीला आला की पुन्हा नदीत डुबकी मारून जनावरे घेऊन घरी जायचो नंतर रात्रीच्या वेळी चिली पाटीचा खेळ व्हायचा गावात लोक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे अतिशय रमणीय वातावरण असायचे आमच्या कडे इर्जुक असायची इर्जुक म्हणजे सामुदायिक कामे केली जायची एखाद्या शेतकर्यांचे शेत तयार करणे फुटलेला बांध तयार करणे,पडघई,राबणीच्या कामाला लोक एकत्र येऊन काम करायचे दिवस मावळतीला गेला की तिखट गोडाचे जेवण असायचे गाणे ,नाच व्हायचे असा गावगाडा चालायचा माझे वडील शाळा मास्तर असल्याने रात्रीच्या वेळी रात्र शाळा भरायची गावातील गायखे,म्हणजे गुराखी तरुण मोठाले टोंगळे कोपरी व अर्ध्या इजारीत शाळेला यायचे त्यांना इकडून एक वाटी तिकडून एक वाटी मध्यभागी एक काठी तो झाला क असे मूळ अक्षरे शिकवली जायचे “पूर्वी शिक्षणाचा अभाव असल्याने गावात जातीभेद, अंधश्रद्धा आणि व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. मात्र शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनामुळे गावाचा चेहरामोहराच बदलला,” अशा शब्दांत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या लव्हाळी गावातील सामाजिक परिवर्तनाचा प्रवास उलगडून सांगितला. “त्या काळात एखाद्याचे आरोग्य बिघडले की डॉक्टरांऐवजी अंगारे-धुपारे केले जायचे. अनेकदा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूही ओढवायचा. मागासवर्गीय लोकांना पाणी, बियाणे किंवा जेवणही दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत माझे वडील शिक्षक असल्याने परिवर्तनाची सुरुवात आमच्या घरापासून झाली. त्यांनी कधीच कोणाला नाकारले नाही,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “त्या काळात मागासवर्गीय लोकांना जर्मलच्या भांड्यात पाणी किंवा अन्न मागावे लागायचे. मात्र आमच्या कुटुंबाने त्यांना घरात बसवून जेवण दिले. वडिलांनी सातत्याने प्रबोधन करून गावातील सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच गावात एकोपा निर्माण झाला.” गावातील लोकजीवनाचे चित्र उभे करताना त्यांनी सांगितले की, “गावात एखादे पत्र आले की लोक ते वाचून घेण्यासाठी वडिलांकडे यायचे. वडील त्यांना पत्राचा मजकूर वाचून दाखवायचे. त्यामुळे लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी समजायच्या. आज लव्हाळी गावात सर्व जाती-धर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, हीच त्या प्रबोधनाची खरी कमाई आहे.” गावाच्या आर्थिक परिस्थितीविषयी बोलताना त्यांनी सांगितले, “गावातील शेती तुकड्या-तुकड्यांची होती. भात हे मुख्य पीक होते. शेतीची कामे संपल्यानंतर गावातील कर्ते पुरुष रोजगारासाठी नारायणगाव, जुन्नर परिसरात मजुरीसाठी जात असत. दिवाळीपूर्वी मजुरीच्या पैशातून किराणा आणि कपडे घेऊन ते गावाकडे परतायचे.” “मी शिक्षणासाठी अहिल्यानगर येथे गेलो. माझ्यासोबत गावातील अनेक मित्र शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर पडले. कालांतराने गावाची परिस्थिती बदलली. शेतीला पाणी मिळाले. भाताबरोबरच गहू, हरभरा, भाजीपाला, सोयाबीन अशी विविध पिके शेतात बहरू लागली. त्यामुळे रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली आणि गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू लागले,” असे त्यांनी सांगितले.