Thursday, May 21, 2026

लग्न वाढदिवस

प्रिय अहो, आज आपल्या लग्नाला ३४ सुंदर वर्ष पूर्ण झाली… ही ३४ वर्ष म्हणजे फक्त काळाचा प्रवास नाही, तर प्रेम, विश्वास, साथ, समजूतदारपणा आणि असंख्य आठवणींनी सजलेला आपल्या नात्याचा अमूल्य खजिना आहे. ❤️ जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्ही माझा हात घट्ट धरून उभे राहिलात… सुखात हसवलंत, दुःखात धीर दिलात आणि प्रत्येक क्षणी जाणवून दिलंत की — “खरं प्रेम हे शब्दांत नसतं, तर सोबत निभावण्यात असतं.” तुमच्यासोबतचा प्रत्येक दिवस मला नवीन प्रेरणा देतो. तुमचं प्रेम, तुमची काळजी आणि तुमचा निस्वार्थ स्वभाव हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं भाग्य आहे. 💕 आज आपल्या ३४ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त देवाकडे एकच प्रार्थना — आपलं हे नातं असंच प्रेमाने, विश्वासाने आणि आनंदाने फुलत राहो… 🌸 लग्नाच्या ३४ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… तुम्ही आहात म्हणून माझं आयुष्य इतकं सुंदर आहे… आणि पुढचं प्रत्येक वर्षही तुमच्यासोबतच जगायचं आहे. ❤️

Tuesday, May 19, 2026

मजुषा वाढदिवस

सहजीवनाची शिल्पकार प्रेमाचा झरा त्यागाची मूर्ती ममतेची सावली कर्तृत्ववान अर्धांगिनी संघर्षातील दीपस्तंभ आयुष्याची सोनेरी साथ,जीवनाची प्रेरणा आनंदाची सावली सुखदुःखाची सोबती प्रेमाची मूर्ती आज माझ्या,अर्धांगिनी, जीवनसाथीचा, सौ. मंजुषा काळे हिचा वाढदिवस… २० मे १९७१ रोजी जन्मलेली मंजुषा माझ्या आयुष्यात १० मे १९९२ रोजी आली आणि आयुष्यालाच नवी दिशा मिळाली. पुण्यासारख्या शहरात बालपण गेलेल्या या मुलीने राजूरसारख्या खेड्यात संसाराची सुरुवात केली. बी.ए. पूर्ण झाल्यानंतर लग्न झाले, पण शिक्षणाची जिद्द मात्र कायम ठेवली. संसाराचा गाडा हाकताना डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरणे असो, किराणा साहित्याचे पॅकिंग असो किंवा घरातील प्रत्येक जबाबदारी हसत स्वीकारणे असो… कोणत्याही कामाची तिने कधी लाज बाळगली नाही. प्रपंचाला हातभार लावत तिने बी.एड., एम.ए., एम.एड. आणि व्यवस्थापन पदविका पूर्ण केली. आज ती राजूर येथील स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची यशस्वी प्राचार्या म्हणून कार्यरत आहे. स्वप्नील आणि ऋषीकेश या दोन मुलांवर उत्तम संस्कार करत तिने आईपणही तितक्याच समर्थपणे जपले. गेली ३४ वर्षे संसार करताना अनेक चढ-उतार आले, पण तिच्या जिद्दीने, संयमाने आणि कष्टाने प्रत्येक संकटावर मात केली. आज अनेक पुरस्कारांनी सन्मानित होत असतानाही तिची पावले अजूनही गोरगरीब मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी धावत आहेत. वयाचे अर्धशतक पार करूनही तिची उर्मी, कामावरील निष्ठा आणि समाजासाठीची तळमळ आजही तितकीच प्रेरणादायी आहे.माझ्या भाऊ बहिणी,भाचे नातेवाईक यांना एकत्र ठेवून त्यांची काळजी घेऊन त्यांच्या मनात घर करणारी..... माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे उभी राहिलेल्या माझ्या सहचारिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! तुझे आयुष्य निरोगी, आनंदी आणि यशस्वी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… 🎂 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मंजुषा! 💐

डोंगराची काळी मैना बाजारात

अकोले, ता. १९ : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अकोले तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सध्या रानमेव्याची चाहूल लागली असून डोंगरची ‘काळी मैना’ म्हणून ओळख असलेल्या करवंदांनी राजूर परिसरातील बाजारपेठ गजबजू लागली आहे. रंधा, माळेगाव, घाटघर, शिंगणवाडी, रतनवाडी आदी डोंगराळ भागातील करवंदांच्या जाळ्या काळ्याभोर फळांनी लगडल्या असून उन्हाळ्यातील हा आंबट-गोड रानमेवा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये एप्रिल-मे महिन्यात करवंदांचा हंगाम सुरू होतो. यंदा मात्र वैशाख सुरू होऊनही करवंदे उशिरा पिकत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निसर्गाच्या बदलत्या चक्राबाबत आदिवासी बांधवांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. काही जण यंदा पावसालाही उशीर होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. शाळांना सुट्ट्या लागल्याने अनेक आदिवासी मुले पहाटेपासून जंगलाची वाट धरत आहेत. पाटीभर करवंदे गोळा करून राजूर बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याचा त्यांचा रोजचा दिनक्रम बनला आहे. पळस किंवा चांद्याच्या पानांचे डोमे तयार करून राजूर बसस्थानक परिसरात ‘करवंद घ्या... करवंद...’ अशी हाक देत ही चिमुकली विक्री करताना दिसत आहेत. भंडारदरा, हरिश्चंद्रगड किंवा रंधा धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांभोवतीही ही मुले गर्दी करत असल्याचे चित्र आहे. एका डोम्याची किंमत पाच ते दहा रुपये असून दिवसभरात शंभर ते दीडशे रुपयांची विक्री होत असल्याचे मुलांनी सांगितले. शाळा सुरू झाल्यावर नवीन वह्या, पुस्तके आणि गणवेश घेण्यासाठी हे पैसे उपयोगी पडणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही मुले घरखर्चाला हातभार लावण्यासाठीही करवंद विक्री करत आहेत. रंधा, माळेगाव, केळुंगण, घाटघर, शिंगणवाडी, मुरशेत, बारी, रतनवाडी, कोलटेंभे या भागात करवंदांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र या रानमेव्याला स्थानिक बाजारपेठेपलीकडे फारसा पर्याय उपलब्ध नाही. राहाता, शिर्डी, राहुरी, कोल्हार, संगमनेर परिसरातील व्यापारी अल्प दराने करवंद खरेदी करत असल्याने आदिवासी बांधवांना अपेक्षित मोबदला मिळत नसल्याची खंत व्यक्त होत आहे. आदिवासी महामंडळाने करवंद खरेदीसाठी पुढाकार घेत योग्य हमीभाव दिल्यास आदिवासी भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. आकर्षक पॅकिंगद्वारे पुणे, मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेत करवंद पोहोचल्यास ‘डोंगरची काळी मैना’ ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला. दरम्यान, काही ठिकाणी डोंगरांना लागणाऱ्या आगीमुळे करवंदांच्या जाळ्या नष्ट होत असल्याने पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. वनविभागाने करवंदाच्या झाडांचे संवर्धन व संगोपनासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

Wednesday, May 13, 2026

माझे गाव आमदार लहामटे

अकोले,ता.१३:आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दैनिक सकाळ प्रतिनिधींशी बोलताना आपल्या गावाची महती इतिहास लोक संस्कृती सांगताना ते म्हणाले माझं गाव हरिशचंद्र गडाच्या कुशीत वसलेले लव्हाळी हे गाव आजूबाजूला सह्याद्रीच्या मोठं मोठ्या लांबच लांब पर्वत रांगा असणारा अतिदुर्गम आदिवासी परिसर सुरुवातीच्या काळात माझ्या या जन्म गावात लहानपण गेले या गावात रांगलो, खेळलो,धावलो शिकलो नंतर शिक्षणासाठी साकिरवाडी येथे गेलो राजूर हे गाव माझी कर्मभूमी मात्र जननी जन्मोभूमी स्वर्गापेक्षा सुंदर आहे .हरिशचंद्र गड परिसरातील लव्हाळी गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे .पूर्वी इथे रस्ते,वीज,पाणी याची सोय नव्हती ,मातीची व कौलारू घरे होती,ही घरे पावसाळ्यात गळू नये म्हबून चाळून घेतली जायची फुटलेली कौले बदलून नव्याने कौले टाकली जायची असा या गावात माझा जन्म झाला वडील शाळा मास्तर, आई शेती व घरकाम करायची २भाऊ१बहीण व मी असा आमचा परिवार गावातील लोक भोळी भाबडी ,सुतार,लोहार न्हावी,तेली,शिंपी ,परीट असा बारा बलुतेदारसमाजाचा गावाशी नेहमी संपर्क असायचा पावसाळ्यापूर्वी सुतार बाबा यायचा शेतीचे लाकडी काम करून द्यायचा, लोहार बाबा शेतीचे लोखंडी अवजारे नांगर,विळे, कोयते,कुऱ्हाड, करून द्यायचा तर परीट घोड्यावर येऊन कपडे ,गोधड्या धुऊन द्यायचा तेली चार महिने पुरेल इतके तेल तर वंजारी बोंबील ,मांदिले देऊन जायचा व चारमहिन्यांनी पीक आल्यावर धान्य रूपाने बिदागी घेऊन जायचे : “जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही सुंदर असते, याचा प्रत्यय मला माझ्या लव्हाळी गावाकडे पाहिल्यावर आजही येतो,” अशा भावनिक शब्दांत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दैनिक सकाळ प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेल्या आपल्या जन्मगावाची महती, इतिहास आणि लोकसंस्कृती उलगडून सांगितली. “सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांनी वेढलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लव्हाळी गावात माझे बालपण गेले. याच मातीत मी रांगलो, खेळलो, धावलो आणि शिकलो. पुढे शिक्षणासाठी साकिरवाडी येथे गेलो, तर राजूर ही माझी कर्मभूमी ठरली,” असे ते म्हणाले. लव्हाळी गावाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी गावात रस्ते, वीज आणि पाण्याच्या सुविधा नव्हत्या. मातीची आणि कौलारू घरे हेच गावाचे वैशिष्ट्य होते. पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी केली जाई. फुटलेली कौले बदलून नवीन कौले टाकली जात. “अशा साध्या, संघर्षमय वातावरणात माझा जन्म झाला. वडील शाळामास्तर होते, तर आई शेती आणि घरकाम सांभाळत होती. दोन भाऊ, एक बहीण आणि मी असा आमचा परिवार होता,” असे त्यांनी सांगितले. गावातील सामाजिक रचनेविषयी बोलताना त्यांनी बारा बलुतेदार पद्धतीची आठवण सांगितली. “सुतार बाबा शेतीची लाकडी कामे करायचे, लोहार बाबा नांगर, विळे, कोयते, कुऱ्हाडी तयार करून द्यायचे. परीट घोड्यावर येऊन कपडे व गोधड्या धुऊन द्यायचा. तेली वर्षभर पुरेल इतके तेल आणून द्यायचा, तर वंजारी बोंबील व मांदेली देऊन जायचा. चार महिन्यांनंतर पीक आल्यानंतर त्यांना धान्यरूपाने बिदागी दिली जायची,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनपद्धतीचे जिवंत चित्र उभे केलेवाघ बारसं हा सण आमचे गावात फार महत्वाचा सण या दिवशी आम्ही मुले निघायचो अगोदर जंगलातील लाकडे गोळा करून चूल पेटवायचो त्यात मोठे भगुले ठेवून त्यात भाताची खीर बनवायचो मग नदीच्या काठावर जाऊन अंघोळ करून आमच्यातील एक वाघ्या व्हायचा त्याला आम्ही मुले भाताचे छोटे गोळे करून मारायचो सूर पारंब्या खेळत दिवस मावळतीला आला की पुन्हा नदीत डुबकी मारून जनावरे घेऊन घरी जायचो नंतर रात्रीच्या वेळी चिली पाटीचा खेळ व्हायचा गावात लोक एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे अतिशय रमणीय वातावरण असायचे आमच्या कडे इर्जुक असायची इर्जुक म्हणजे सामुदायिक कामे केली जायची एखाद्या शेतकर्यांचे शेत तयार करणे फुटलेला बांध तयार करणे,पडघई,राबणीच्या कामाला लोक एकत्र येऊन काम करायचे दिवस मावळतीला गेला की तिखट गोडाचे जेवण असायचे गाणे ,नाच व्हायचे असा गावगाडा चालायचा माझे वडील शाळा मास्तर असल्याने रात्रीच्या वेळी रात्र शाळा भरायची गावातील गायखे,म्हणजे गुराखी तरुण मोठाले टोंगळे कोपरी व अर्ध्या इजारीत शाळेला यायचे त्यांना इकडून एक वाटी तिकडून एक वाटी मध्यभागी एक काठी तो झाला क असे मूळ अक्षरे शिकवली जायचे “पूर्वी शिक्षणाचा अभाव असल्याने गावात जातीभेद, अंधश्रद्धा आणि व्यसनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर होते. मात्र शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनामुळे गावाचा चेहरामोहराच बदलला,” अशा शब्दांत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या लव्हाळी गावातील सामाजिक परिवर्तनाचा प्रवास उलगडून सांगितला. “त्या काळात एखाद्याचे आरोग्य बिघडले की डॉक्टरांऐवजी अंगारे-धुपारे केले जायचे. अनेकदा योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यूही ओढवायचा. मागासवर्गीय लोकांना पाणी, बियाणे किंवा जेवणही दिले जात नव्हते. अशा परिस्थितीत माझे वडील शिक्षक असल्याने परिवर्तनाची सुरुवात आमच्या घरापासून झाली. त्यांनी कधीच कोणाला नाकारले नाही,” असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “त्या काळात मागासवर्गीय लोकांना जर्मलच्या भांड्यात पाणी किंवा अन्न मागावे लागायचे. मात्र आमच्या कुटुंबाने त्यांना घरात बसवून जेवण दिले. वडिलांनी सातत्याने प्रबोधन करून गावातील सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच गावात एकोपा निर्माण झाला.” गावातील लोकजीवनाचे चित्र उभे करताना त्यांनी सांगितले की, “गावात एखादे पत्र आले की लोक ते वाचून घेण्यासाठी वडिलांकडे यायचे. वडील त्यांना पत्राचा मजकूर वाचून दाखवायचे. त्यामुळे लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या सुख-दुःखाच्या गोष्टी समजायच्या. आज लव्हाळी गावात सर्व जाती-धर्मातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात, हीच त्या प्रबोधनाची खरी कमाई आहे.” गावाच्या आर्थिक परिस्थितीविषयी बोलताना त्यांनी सांगितले, “गावातील शेती तुकड्या-तुकड्यांची होती. भात हे मुख्य पीक होते. शेतीची कामे संपल्यानंतर गावातील कर्ते पुरुष रोजगारासाठी नारायणगाव, जुन्नर परिसरात मजुरीसाठी जात असत. दिवाळीपूर्वी मजुरीच्या पैशातून किराणा आणि कपडे घेऊन ते गावाकडे परतायचे.” “मी शिक्षणासाठी अहिल्यानगर येथे गेलो. माझ्यासोबत गावातील अनेक मित्र शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेर पडले. कालांतराने गावाची परिस्थिती बदलली. शेतीला पाणी मिळाले. भाताबरोबरच गहू, हरभरा, भाजीपाला, सोयाबीन अशी विविध पिके शेतात बहरू लागली. त्यामुळे रोजगारासाठी होणारी भटकंती थांबली आणि गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू लागले,” असे त्यांनी सांगितले.

राजूर माझे गाव आमदार वैभव पिचड

अकोले,ता.१३:अहमदनगर जिल्ह्यातील (सध्याचे अहिल्यानगर) Rajur हे गाव इतिहास, परंपरा आणि राजकीय नेतृत्वाची समृद्ध परंपरा लाभलेले गाव म्हणून ओळखले जाते. पेशवे काळात “राजाचा उर” म्हणून या गावाचा उल्लेख होत असल्याने पुढे त्याचे “राजूर” असे नामकरण झाल्याची आख्यायिका आजही ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. सण-उत्सव, उरूस, प्रदर्शन, बोहडा यांसारख्या पारंपरिक संस्कृतीचे जतन आजही राजूरमध्ये मोठ्या उत्साहात केले जाते. ग्रामदैवतांच्या यात्रांपासून धार्मिक सोहळ्यांपर्यंत गावात सामाजिक ऐक्याचे दर्शन घडते. ग्रामीण संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपत राजूरने काळानुसार विकासाचाही प्रवास केला आहे. राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये राजूरने अकोले तालुक्याचे नेतृत्व केले. स्वर्गीय नारायण नवाळी, B. K. Deshmukh तसेच Madhukarrao Pichad यांनी तालुक्याचे प्रतिनिधित्व करत राजूरचे नाव राज्यभर पोहोचविले. विशेषतः मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वामुळे राजूरची ओळख राज्य आणि देशपातळीवर निर्माण झाली. पूर्वी गावात रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षण सुविधांचा मोठा अभाव होता. मात्र लोकप्रतिनिधींच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हळूहळू विकासकामांना गती मिळाली. आदिवासी बहुल गाव असल्याने स्थानिक नेतृत्वात आदिवासी समाजाचे वर्चस्व राहिले. स्वर्गीय नारायण रामजी देशमुख उर्फ तात्या यांनी गावचे नेतृत्व स्वीकारत ग्रामविकासाला दिशा दिली. तर वंजारी, तेली, माळी, सोनार, शिंपी अशा अठरापगड समाजातील लोकांनी उपसरपंच पदावर काम करत गावच्या प्रशासनात योगदान दिले. गावचे पोलीस पाटील म्हणून विलास भिकाजी देशमुख यांनी अनेक वर्षे जबाबदारी सांभाळली. ब्रिटिश काळात पोलीस पाटलाला विशेष महत्त्व होते. गावातील भांडणे, तंटे, चोरी किंवा गंभीर वाद हे चावडीवर बसून सामोपचाराने सोडविले जात. ग्रामव्यवस्थेतील लोकसहभाग आणि न्यायनिवाड्याची ही परंपरा राजूरच्या सामाजिक संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानली जाते.Rajur गावाची बाजारपेठ एकेकाळी तालुक्यातील प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून ओळखली जात होती. विशेषतः मारवाडी व गुजराथी समाजाने येथे व्यापार व्यवसाय उभारून राजूरच्या आर्थिक विकासात मोठे योगदान दिले. व्यापारी वर्ग आणि आदिवासी समाज यांच्यात परस्पर विश्वासाचे नाते होते. बाजारपेठेचे संरक्षण करण्याची जबाबदारी स्थानिक आदिवासी समाज स्वतःच्या कर्तव्याप्रमाणे पार पाडत असे. राजूर बाजारपेठेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न काही दरोडेखोरांनी केल्याची घटना आजही ज्येष्ठ नागरिक सांगतात. मात्र त्या वेळी गावातील समाजधुरीण, व्यापारी आणि आदिवासी समाजाने एकजूट दाखवत हा हल्ला परतवून लावला. त्यामुळे राजूरची ओळख केवळ व्यापारी गाव म्हणून नव्हे, तर एकसंध सामाजिक बांधिलकी जपणारे गाव म्हणून निर्माण झाली. अकोले तालुक्याच्या राजकारण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातही राजूरचे महत्त्व अनन्यसाधारण राहिले आहे. अमृतसागर दूध संघ, Agasti Sahakari Sakhar Karkhana, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच शिक्षण क्षेत्रात राजूरचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर जाणवत होता. Madhukarrao Pichad यांनी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आदिवासी विकास मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते म्हणून विविध पदांवर काम करत अकोले तालुक्याच्या विकासाला वेग दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात जलाशय उभारणी, शेतीसाठी पाणी उपलब्धता आणि टँकरमुक्त गावांची संकल्पना राबविण्यात आली. केवळ अकरा महिन्यांत उभारण्यात आलेला अगस्ती सहकारी साखर कारखाना हा राज्यातील आदिवासी समाजाचा महत्त्वाचा कारखाना ठरला. आदिवासी विकास निधीतून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत तालुक्यातील ऊस तालुक्यातच प्रक्रिया करण्याची व्यवस्था निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना रोजगार आणि त्यांच्या मुलांना कारखान्यात कामाच्या संधी उपलब्ध झाल्या. Vaibhav Pichad आमदार झाल्यानंतर राजूर परिसरातील रस्ते, वीज आणि बसस्थानक विकासाला चालना मिळाली. दूध व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला आणि आजही अनेक कुटुंबांचा तो प्रमुख आर्थिक आधार आहे. राजूर गावच्या पहिल्या महिला सरपंच म्हणून Hemlata Pichad यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामस्थांनी त्यांना दिलेल्या या संधीमुळे राज्यात आदर्श निर्माण झाला. त्यांनी वृक्षलागवड, व्यसनमुक्ती आणि दारूमुक्ती अभियान राबवत राजूरसह १४७ गावांमध्ये जनजागृती केली. गावातील श्री दत्त मंदिरात भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून युवक आणि महिलांमध्ये धार्मिक व सांस्कृतिक संस्कार रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करून गरीब व आदिवासी समाजावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे राजूर गावाने सामाजिक, धार्मिक आणि विकासात्मक क्षेत्रात आदर्श निर्माण केल्याचे मानले जाते.Rajur गावाचा इतिहास हा संघर्ष, शिक्षण आणि विकासाचा प्रवास म्हणून ओळखला जातो. पूर्वी राजूर परिसरात शेती हा व्यवसाय अत्यंत मर्यादित होता. तुकड्या-तुकड्याची जमीन आणि पावसावर अवलंबून असलेली भातशेती एवढेच शेतकऱ्यांचे प्रमुख साधन होते. पाण्याअभावी वर्षातील केवळ चार महिने शेती होत असल्याने अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. ज्यांच्याकडे विहिरी होत्या ते शेतकरी पावसाळ्यानंतर काही प्रमाणात पिके घेत असत, मात्र त्याचे प्रमाण अत्यल्प होते. काही जिद्दी शेतकऱ्यांनी एकत्र येत उपसा सिंचन योजना राबवून पाच ते दहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणले. मात्र असे प्रयोग करणारे शेतकरी बोटावर मोजण्याइतकेच होते. त्यामुळे रोजगारासाठी शिक्षण हाच पर्याय तरुणांसमोर होता. प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती नोकरीला असावी, अशी मानसिकता तयार झाली होती. गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी Sarvodaya Vidya Mandir येथे माध्यमिक शिक्षण घेत असत. पुढील शिक्षणासाठी अकोले, संगमनेर अशा शहरांमध्ये वसतिगृहात राहून किंवा दररोज प्रवास करून अनेक तरुणांनी शिक्षण पूर्ण केले आणि विविध क्षेत्रांत नोकरी व व्यवसायात स्थिरावले. Vaibhav Pichad यांनीही राजूरमध्येच बालपण घालवत मराठी शाळेत शिक्षण घेतले. वडील Madhukarrao Pichad यांच्या राजकीय वारशाला पुढे नेत त्यांनी २०१४ नंतर तालुक्याचे नेतृत्व केले. आमदार झाल्यानंतरही त्यांनी जन्मभूमी असलेल्या राजूरच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. राजूर गावचा पेढा राज्यभर प्रसिद्ध असून गावात सहा ते दहा पेढ्यांची दुकाने आहेत. Bhandardara, Kalsubai Peak आणि Harishchandragad येथे येणारे पर्यटक राजूरचा पेढा घेतल्याशिवाय पुढे जात नाहीत, अशी स्थानिकांमध्ये म्हण प्रचलित आहे. काळानुसार राजूरच्या शेतीतही मोठा बदल झाला. पारंपरिक भातशेतीबरोबर गहू, हरभरा, सोयाबीन, बाजरी, मका, ऊस तसेच भाजीपाल्याची शेती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. सिंचन सुविधा वाढल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीतही सुधारणा झाली. शिक्षण क्षेत्रातही राजूरने मोठी प्रगती केली आहे. गावात तीन माध्यमिक विद्यालये, एक आयटीआय, दोन इंग्रजी माध्यमाच्या शाळा, एक आश्रमशाळा, एक नर्सिंग कॉलेज आणि एक वरिष्ठ महाविद्यालय कार्यरत असून सुमारे पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आरोग्य सुविधांसाठी ग्रामीण रुग्णालय उपलब्ध असून वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी भोजदरी येथे १३२ केव्हीचे वीज उपकेंद्र उभारण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण, शेती, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून राजूर गावाने विकासाचा नवा चेहरा निर्माण केला आहे.

Tuesday, May 12, 2026

जननी जन्मभूमी आमदार लहामटे

अकोले, ता. १३ : “जननी जन्मभूमी स्वर्गापेक्षाही सुंदर असते, याचा प्रत्यय मला माझ्या लव्हाळी गावाकडे पाहिल्यावर आजही येतो,” अशा भावनिक शब्दांत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. दैनिक सकाळ प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी हरिश्चंद्रगडाच्या कुशीत वसलेल्या आपल्या जन्मगावाची महती, इतिहास आणि लोकसंस्कृती उलगडून सांगितली. “सह्याद्रीच्या उंचच उंच पर्वतरांगांनी वेढलेल्या अतिदुर्गम आदिवासी भागातील लव्हाळी गावात माझे बालपण गेले. याच मातीत मी रांगलो, खेळलो, धावलो आणि शिकलो. पुढे शिक्षणासाठी साकिरवाडी येथे गेलो, तर राजूर ही माझी कर्मभूमी ठरली,” असे ते म्हणाले. लव्हाळी गावाचे वर्णन करताना त्यांनी सांगितले की, पूर्वी गावात रस्ते, वीज आणि पाण्याच्या सुविधा नव्हत्या. मातीची आणि कौलारू घरे हेच गावाचे वैशिष्ट्य होते. पावसाळ्यापूर्वी घरांची डागडुजी केली जाई. फुटलेली कौले बदलून नवीन कौले टाकली जात. “अशा साध्या, संघर्षमय वातावरणात माझा जन्म झाला. वडील शाळामास्तर होते, तर आई शेती आणि घरकाम सांभाळत होती. दोन भाऊ, एक बहीण आणि मी असा आमचा परिवार होता,” असे त्यांनी सांगितले. गावातील सामाजिक रचनेविषयी बोलताना त्यांनी बारा बलुतेदार पद्धतीची आठवण सांगितली. “सुतार बाबा शेतीची लाकडी कामे करायचे, लोहार बाबा नांगर, विळे, कोयते, कुऱ्हाडी तयार करून द्यायचे. परीट घोड्यावर येऊन कपडे व गोधड्या धुऊन द्यायचा. तेली वर्षभर पुरेल इतके तेल आणून द्यायचा, तर वंजारी बोंबील व मांदेली देऊन जायचा. चार महिन्यांनंतर पीक आल्यानंतर त्यांना धान्यरूपाने बिदागी दिली जायची,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनपद्धतीचे जिवंत चित्र उभे केले.“वाघ बारसं हा आमच्या गावातील अत्यंत महत्त्वाचा सण होता. त्या दिवशी आम्ही लहान मुले जंगलात जाऊन लाकडे गोळा करायचो. त्यानंतर चूल पेटवून मोठ्या भगुल्यात भाताची खीर तयार केली जायची. मग नदीच्या काठावर जाऊन अंघोळ करायचो. आमच्यातील एक जण ‘वाघ्या’ बनायचा आणि बाकीची मुले भाताचे छोटे गोळे करून त्याच्यावर मारायची. सूरपारंब्या खेळण्यात संपूर्ण दिवस कसा निघून जायचा ते समजायचेही नाही. संध्याकाळी पुन्हा नदीत डुबकी मारून जनावरे घेऊन घरी परतायचो,” असे त्यांनी सांगितले. “रात्रीच्या वेळी गावात ‘चिली पाटी’सारखे पारंपरिक खेळ रंगायचे. गावातील लोक एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी व्हायचे. त्या काळातील वातावरण अतिशय रमणीय आणि जिव्हाळ्याचे होते,” असे सांगताना त्यांनी जुन्या ग्रामीण जीवनातील एकोप्याची आठवण सांगितली. गावातील ‘इर्जुक’ परंपरेविषयी बोलताना ते म्हणाले, “इर्जुक म्हणजे सामुदायिक श्रमदान. एखाद्या शेतकऱ्याचे शेत तयार करणे, फुटलेला बांध बांधणे, पडघई किंवा राबणीची कामे असली की गावकरी एकत्र येऊन काम करायचे. दिवस मावळतीला गेला की तिखट-गोड जेवणाचा बेत असायचा. त्यानंतर गाणी, नाच आणि आनंदाने गाव दुमदुमून जायचे. त्या काळातील गावगाडा हा खऱ्या अर्थाने माणुसकीवर चालणारा होता.” आपल्या वडिलांच्या शिक्षणसेवेच्या आठवणी सांगताना त्यांनी म्हटले, “वडील शाळामास्तर असल्याने रात्री गावात रात्रशाळा भरायची. गावातील गायखे म्हणजे गुराखी तरुण मोठाले टोंगळे, कोपरी आणि अर्धी इजारी घालून शिकायला यायचे. त्यांना अगदी सोप्या पद्धतीने अक्षरओळख शिकवली जायची. ‘इकडून एक वाटी, तिकडून एक वाटी, मध्यभागी एक काठी म्हणजे क’ अशा पद्धतीने मूळाक्षरे शिकवली जात होती. शिक्षण, संस्कार आणि सामुदायिक जीवन हेच त्या काळातील गावाचे खरे वैभव होते,” असे ते म्हणाले.

Monday, April 27, 2026

बापू निर्भीड पत्रकार

पत्रकारिता, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक क्षेत्रातील समर्पित कार्य यांचा सुंदर संगम म्हणजे शांताराम काळे. पत्रकार म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील समस्या, जनतेचे प्रश्न, विकासकामे आणि सामाजिक घडामोडींना सातत्याने वाचा फोडण्याचे काम केले आहे. वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि जनसामान्यांच्या बाजूने उभे राहणारे पत्रकार म्हणून त्यांनी विश्वासार्ह ओळख निर्माण केली आहे. शांताराम काळे यांनी केवळ पत्रकारितेपुरते कार्य मर्यादित न ठेवता सामाजिक क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना चालना देणे, तसेच युवकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. स्वामी समर्थ शिक्षण संस्था, राजूरचे सचिव म्हणून त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक सुविधा, शिस्तबद्ध वातावरण आणि संस्कारमूल्ये देण्याच्या दृष्टीने त्यांनी अनेक उपक्रम राबवले. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेची विश्वासार्हता वाढली असून पालक, विद्यार्थी आणि समाजात सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. पत्रकारिता आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे शांताराम काळे हे समाजासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व मानले जाते.

लग्न वाढदिवस

प्रिय अहो, आज आपल्या लग्नाला ३४ सुंदर वर्ष पूर्ण झाली… ही ३४ वर्ष म्हणजे फक्त काळाचा प्रवास नाही, तर प्रेम, विश्वास, साथ, समजूतदारपणा आणि अस...