Saturday, August 22, 2020

धुक्यात हरवली गावे

अकोले, ता.२२: मोठं मोठे धुक्याचे डोंगर त्यामुळे रस्ता दिसेना की गाव दिसेना चोंढे घाटाच्या वरती विस्वलेले गाव धुक्यात हरवली आहे ....भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर गाव ,प्रकल्पग्रस्त म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले हे गाव चार महिने पाऊस ,धुके यांच्या लंप डावात सापडलेले गाव दरवर्षी पाच हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पर्जन्य वृष्टी होणारे व घाटाचा परिसर असल्याने पडलेले घाटघर नाव ,जेमतेम ८०० लोकवस्ती मुख्य व्यवसाय शेती परंतु त्यातील काही जमीन प्रकल्पात गेली असल्याने न्याय हककासाठी ,सरकारच्या विरोधात आंदोलन,न्यायालयात दावे करून भिक नको आम्हाला हवे घामचे दाम  आधी पुनर्वसन मग प्रकल्प म्हणत संघर्ष करत इथिलं ठाकर आदिवासी कांदडी समाजाचे लोक जगत आहेत.माजी आदिवासी विकास मंत्री यांनी प्रकल्पात हे स्वतंत्र गाव बसवले त्यांना सर्व सुविधा ,रस्ते,वीज,पाणी ,आरोग्य केंद्र,आश्रमशाळा,देऊन घरटी माणसाला नोकरी दिली मात्र अजून काही मागण्या अपूर्ण असून मध्यंतरी ग्रामस्थांनी वीज प्रकल्प बंद पाडला त्यामुळे त्यांची शासन दरबारी दख ल घेऊन त्यांच्या मागण्या मंजूर केल्या ,दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते पाऊस व धुके या गावात सतत त्यामुळे वृध्द माणसे , जनावरे घरातच राहतात .भातपीक निम्मेच पदरात पडते तर अतिवृष्टी मुळे पीक धुऊन जाण्याचे प्रमाण अधिक,वीज टिकत नाही त्यामुळे पाणी नाही मग झुर्‍याचे पाणी किवा लवाचे पाणी ,प्यावे लागते ,भात मासे आमटी हे त्यांचे मुख्य अन्न चौमुळी कौलाची घरे पारंपारीक पद्धतीने दगडी बांधकाम,लाकूड,वापरून उभारलेली ही घरे पर्यटक ना आकर्षित करतात स्वच्छता टापटीप पना , घरात लाकडी धूनी पेटलेली गॅस वनविभागाने दिला आला तरी चुलीवरची जेवण पसंदी ग्रमस्थ देतात ,निसर्गाने नटलेला हा परिसर चारी बाजूने सह्याद्रीचे डोंगर,त्यावरून पडणारे पांढरेशुभ्र धबधबे, कोकणकड्याच्या परिसरात येणारे धुके,पाऊस व त्याचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक त्यांच्या सेवेसाठी जेवण, चहा,भजी,शेंगा, मका कणीस घेऊन व्यवसाय करणारे  स्थानिकतरुण त्यातून मिळणारा रोजगार मात्र यावर्षी कोरोणा संकटामुळे पर्यटक बंदी त्यामुळे स्थानिकांना रोजगार नाही .अतिवृष्टीमुळे शेतीत काहीच नाही त्यामुळे घाटघर गाव अडचणीत सापडले आहे .सरकारने अजून खाव टी दिली नाही ,तर पर्यटन सुरू करावे ही ग्रामस्थांनी केलेली मागणी सरकार काय करेल हे माहीत नाही पण निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाचे अर्थकारण बिघडले हे मात्र खरे ,पाऊस अमच्यकडे पडतो त्यामुळे भंडारदरा जलाशय भरते त्यातून लाभक्षेत्र आनंदी होते साखर कारखाने,खाजगी कारखाने ,दारूचे कारखाने आनंदी होतात मात्र आमचे रोजचे मरण त्याला कोण रडणार सरकारने आम्हाला कायम स्वरुपी रोजगार द्यावा असे इथिळ आदिवासींचे मत आहे कोट -,धोंडीबा सोंगाळ (माजी सरपंच घाटघर)-,अतिवृष्टी झाली पंचनामे झाले मात्र भरपाई नाही चार महिने धुके ,पाऊस त्यामुळे घरात बसून राहावे लागते त्यात भातपीक येत नाही सरकार भरपाई नाही की खाव टी देत नाही,टीत पर्यटन नाही त्यामुळे रोजगार नाही पुढारी फक्त मत घेण्यासाठी येतात ,पिचड साहेबांनी पुनर्वसन केले मात्र त्यांचे सरकार नाही त्यामुळे सगळे अडचणीचे झाले आहे ,भंडारदरा आमच्या नऊ गावाचा आत्मा आहे ,तो भरताना आमचे मोठे नुकसान होते मात्र पुढारी व लाभक्षेत्र मंडळी धरणावर आनंद व्यक्त करतात मात्र आमचे काय हाल आहेत कधी पाहिले का ?नऊ गावाला एकाही कारखान्याने कोरोना काळात मदत केली नाही ते जाणीव नसलेले लोक आहेत असेही सोंगा ळ म्हणाले सोबत फोटो.

Thursday, August 20, 2020

कौशल्य विकास


केंद्र सरकारकडून सातत्याने कौशल्य विकासाचा नारा लावला जात असतांना युवकांपर्यंत अजूनही पुरेशा प्रमाणात याबाबतची माहिती पोहचलेली नाही. देशाला २०२० पर्यंत १२ कोटी कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी ‘स्कील इंडिया डेव्हलपमेंट मिशन’ ही योजना सुरु आहे. देशात दहावी पासूनच करिअरचा विचार करणारे २३ टक्के, बारावीपासून ३८ टक्के आणि पदवीनंतर याबाबतचा विचार सुरु करणारे ४७ टक्के विद्यार्थी आहेत. फक्त १८ टक्के विद्यार्थीच करिअर विषयक समुपदेशन सुविधेचा लाभ घेतात. आपल्या देशात कुशल मनुष्यबळाचे प्रमाण फक्त २० टक्केच असून चीनमध्ये ४५ टक्के, अमेरिकेत ५६ टक्के, जर्मनीत ७४ टक्के, जपानमध्ये  ८० टक्के आणि दक्षिण कोरियात ९६ टक्के कुशल मनुष्यबळ असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले आहे. तसेच कौशल्य शिक्षणाचे – व्यवसाय शिक्षणाचे – चीनमध्ये १०० तर जर्मनीमध्ये १६० विद्यापीठे आज अस्तित्वात आहेत.
भारतात आजही ८३ टक्के युवकांना शासकीय नोकरी अनुकूल वाटते. १६ टक्के युवकांना व्यवसाय करावा असे वाटते तर खाजगी क्षेत्राकडे वळणाऱ्यांचे प्रमाण फक्त ६ टक्केच आहे. राज्याच्या सध्याच्या शैक्षणिक धोरणांवर ७४ टक्के विद्यार्थ्यांनी असमाधान व्यक्त केले आहे.
आपल्या राज्यात सरकारने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांद्वारे २०२२ पर्यंत ५० कोटी मनुष्यबळाचे कौशल्य विकसित करण्याचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. विविध क्षेत्रांतील कौशल्य विकासाशी संबंधित ६०० प्रशिक्षण कोर्सेस उपलब्ध केले आहे. राज्यात एकूण ४१७ शासकीय आणि ४५४ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एकूण ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते.
व्यावसायिक अभ्यासक्रमांचा विचार केला असता जवळजवळ तीन दशकांपूर्वी व्यावसायिक अभ्यासक्रमांना तांत्रिक शिक्षण किंवा टेक्निकल असं म्हटलं जायचं. त्याला शालेय शिक्षणामध्ये अतिरिक्त ग्रेड असायची. ज्या विद्यार्थ्यांना आठवीनंतर या तांत्रिक अभ्यासक्रमाचा फायदा करून घ्यायचा आहे ते विद्यार्थी यासाठी आठवड्यातून साधारणत: एकदा दर शुक्रवारी, यासंबंधीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात असे. यामध्ये मुळातच विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी किंवा आयटीआयच्या अभ्यासक्रमांची प्राथमिक माहिती व्हावी व त्यासाठी त्यांची आवड वृध्दिगत व्हावी हा यामागचा हेतू होता. मात्र शासनाने प्रयत्न करूनही म्हणावे तसे यश येत नव्हते. त्यावेळी मुलांमध्ये, पालकांमध्ये याबद्दल अजिबात जागरूकता नव्हती, हे एक महत्त्वाचे कारण त्याच्या अपयशामागे होते असे म्हणता येईल.

Saturday, August 8, 2020

भंडारदरा

https://www.esakal.com/ahmednagar/mula-bhandardara-catchment-rains-again-331265

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...