Saturday, August 22, 2020

धुक्यात हरवली गावे

अकोले, ता.२२: मोठं मोठे धुक्याचे डोंगर त्यामुळे रस्ता दिसेना की गाव दिसेना चोंढे घाटाच्या वरती विस्वलेले गाव धुक्यात हरवली आहे ....भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर गाव ,प्रकल्पग्रस्त म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले हे गाव चार महिने पाऊस ,धुके यांच्या लंप डावात सापडलेले गाव दरवर्षी पाच हजार मिलिमीटर पेक्षा अधिक पर्जन्य वृष्टी होणारे व घाटाचा परिसर असल्याने पडलेले घाटघर नाव ,जेमतेम ८०० लोकवस्ती मुख्य व्यवसाय शेती परंतु त्यातील काही जमीन प्रकल्पात गेली असल्याने न्याय हककासाठी ,सरकारच्या विरोधात आंदोलन,न्यायालयात दावे करून भिक नको आम्हाला हवे घामचे दाम  आधी पुनर्वसन मग प्रकल्प म्हणत संघर्ष करत इथिलं ठाकर आदिवासी कांदडी समाजाचे लोक जगत आहेत.माजी आदिवासी विकास मंत्री यांनी प्रकल्पात हे स्वतंत्र गाव बसवले त्यांना सर्व सुविधा ,रस्ते,वीज,पाणी ,आरोग्य केंद्र,आश्रमशाळा,देऊन घरटी माणसाला नोकरी दिली मात्र अजून काही मागण्या अपूर्ण असून मध्यंतरी ग्रामस्थांनी वीज प्रकल्प बंद पाडला त्यामुळे त्यांची शासन दरबारी दख ल घेऊन त्यांच्या मागण्या मंजूर केल्या ,दरवर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी होते पाऊस व धुके या गावात सतत त्यामुळे वृध्द माणसे , जनावरे घरातच राहतात .भातपीक निम्मेच पदरात पडते तर अतिवृष्टी मुळे पीक धुऊन जाण्याचे प्रमाण अधिक,वीज टिकत नाही त्यामुळे पाणी नाही मग झुर्‍याचे पाणी किवा लवाचे पाणी ,प्यावे लागते ,भात मासे आमटी हे त्यांचे मुख्य अन्न चौमुळी कौलाची घरे पारंपारीक पद्धतीने दगडी बांधकाम,लाकूड,वापरून उभारलेली ही घरे पर्यटक ना आकर्षित करतात स्वच्छता टापटीप पना , घरात लाकडी धूनी पेटलेली गॅस वनविभागाने दिला आला तरी चुलीवरची जेवण पसंदी ग्रमस्थ देतात ,निसर्गाने नटलेला हा परिसर चारी बाजूने सह्याद्रीचे डोंगर,त्यावरून पडणारे पांढरेशुभ्र धबधबे, कोकणकड्याच्या परिसरात येणारे धुके,पाऊस व त्याचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक त्यांच्या सेवेसाठी जेवण, चहा,भजी,शेंगा, मका कणीस घेऊन व्यवसाय करणारे  स्थानिकतरुण त्यातून मिळणारा रोजगार मात्र यावर्षी कोरोणा संकटामुळे पर्यटक बंदी त्यामुळे स्थानिकांना रोजगार नाही .अतिवृष्टीमुळे शेतीत काहीच नाही त्यामुळे घाटघर गाव अडचणीत सापडले आहे .सरकारने अजून खाव टी दिली नाही ,तर पर्यटन सुरू करावे ही ग्रामस्थांनी केलेली मागणी सरकार काय करेल हे माहीत नाही पण निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गावाचे अर्थकारण बिघडले हे मात्र खरे ,पाऊस अमच्यकडे पडतो त्यामुळे भंडारदरा जलाशय भरते त्यातून लाभक्षेत्र आनंदी होते साखर कारखाने,खाजगी कारखाने ,दारूचे कारखाने आनंदी होतात मात्र आमचे रोजचे मरण त्याला कोण रडणार सरकारने आम्हाला कायम स्वरुपी रोजगार द्यावा असे इथिळ आदिवासींचे मत आहे कोट -,धोंडीबा सोंगाळ (माजी सरपंच घाटघर)-,अतिवृष्टी झाली पंचनामे झाले मात्र भरपाई नाही चार महिने धुके ,पाऊस त्यामुळे घरात बसून राहावे लागते त्यात भातपीक येत नाही सरकार भरपाई नाही की खाव टी देत नाही,टीत पर्यटन नाही त्यामुळे रोजगार नाही पुढारी फक्त मत घेण्यासाठी येतात ,पिचड साहेबांनी पुनर्वसन केले मात्र त्यांचे सरकार नाही त्यामुळे सगळे अडचणीचे झाले आहे ,भंडारदरा आमच्या नऊ गावाचा आत्मा आहे ,तो भरताना आमचे मोठे नुकसान होते मात्र पुढारी व लाभक्षेत्र मंडळी धरणावर आनंद व्यक्त करतात मात्र आमचे काय हाल आहेत कधी पाहिले का ?नऊ गावाला एकाही कारखान्याने कोरोना काळात मदत केली नाही ते जाणीव नसलेले लोक आहेत असेही सोंगा ळ म्हणाले सोबत फोटो.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...