Friday, June 11, 2021

भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे.

[11/06, 1:55 pm] Manju: भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे.येथे भंडारदरा धरण आहे. या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भौगोलिक अक्षांश- १९० ३१’ ४” उत्तर; रेखांश ७३० ४’ ५”पूर्व.

भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.

भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.

भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नावविल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. हा प्रदेश महर्षी अगस्ती आणि महर्षी वाल्मिकी अशा ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेला असून जवळच अकोले येथे महर्षी अगस्ती यांचा आश्रम व आजोबाचा डोंगर येथे महर्षी वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. प्रवरेच्या बाबतीत अशी आख्यायिका आहे की अगस्ती ऋषींच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन देव पृथ्वीवर अवतरले व त्यांनी गंगेचीच एक धारा असलेली प्रवरा नदी इथे प्रवाहित केली. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हटले जाते.

मुख्य आकर्षण

कळसूबाई 
भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदीर आहे. नवरात्रात इथे दररोज हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येतात. शिखरावरुन दिसणारे परिसराचे दृश्य अतिशय मनमोहक असे आहे.

अम्ब्रेला फॉल 
विल्सन डॅमवरच एक मोठा गोलाकार धबधबा असून त्याच्या छत्रीसारख्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे त्याला 'अम्ब्रेला फॉल' असे म्हणतात. धरणाचे आवर्तन सुरु असताना खुप दुरवरुनही अम्ब्रेला फॉल बघता येऊ शकतो. मात्र हा अम्ब्रेला फॉल केवळ जुलै ते ऑक्टोबर महिन्यांतच पहायला मिळतो.

रंधा फॉल 
शेंडी या गावापासून १० किलोमीटर अंतरावर रंधा या गावात एक विशाल धबधबा असून तो गावाच्या नावावरूनच रंधा फॉल म्हणून प्रसिद्ध आहे. सध्या हा धबधबा त्यावर असलेल्या जलविद्युत प्रकल्पामुळे फक्त पावसाळ्यातच पहायला मिळतो. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय रौद्र रूप धारण करतो. पावसाळ्यात मुख्य धबधब्याच्या उजव्या बाजुने अजुन एक धबधबा पहायला मिळतो. दोन्ही धबधबे पुर्ण क्षमतेने वाहत असताना पाहणे हा एक रोमांचित करणारा अनुभव आहे.

रतनवाडी 
भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता येते. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंथी मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे, पावसाळ्यात हे शिवलिंग पुर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते.                                 
                           

'नान्ही फॉल नेकलेस फॉल'                                      

घाटघर 
शेंडी येथुन पश्चिमेकडे २२ किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. इथे अनेक धबधबे असुन पावसाळ्यात हा संपुर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खुप पाऊस पडतो म्हणुन यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते.
                                                                    सादंन दरी                                                   साम्रद गावापासून  10 ते15 मिनिटांत दरीत पोहोचते  दरी 3ते 4 किमी आहे आशिया खंडातील 2 नंतरची सादंन दरी आहे
[11/06, 1:57 pm] Manju: सांधण व्हॅली ! सह्याद्री मधली एक खोल दरी, आशिया खंडातील क्रमांक दोनची खोल दरी.अत्यंत सुंदर आणि तितकीच भयाण. सांधण व्हॅली ची खोली फक्त २०० फूट असली, तरीही त्या २०० फूट मध्ये सह्याद्रीचं  सौंदर्य ठळकपणे दिसतं ! रतनगड, कळसुबाई शिखर, अलंग मदन कुलंग यांनी वेढा दिलेली अशी ही "valley  of shadows" म्हणजे प्रत्येक गिर्यारोहकासाठी अगदी ऑल इन वन पॅकेजच !
[11/06, 2:04 pm] Manju: सांदण दरी... सांदण दरी

एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्टलाईन (भौगोलिक प्रस्तरभंग रेषा) म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी भेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे. असच एक

सह्याद्रीनव म्हणजे सांदण

दरी..... सह्याद्रीच्या रुपापुढे फक्त या नतमस्तक व्हायच.... आपण कितीही मोठे झाले असलो तरी या सह्याद्रीच्या निसर्गाच्या पुढे किती खुजे आहोत याची जाणीव यांच्या नुसत्या दर्शनाने आपल्याला होते. सांदण दरीचे वैशिष्ठ म्हणजे ही जमिनीच्या पातळीखाली आहे. इथे खाली थोडेसे उतरावे लागते. घळीच्या सुरुवातीलाचा एक जिवंत झरा आहे जो कधीही आटत नाही. सांदण दरी दोनशे ते चारशे फुट खोल आणि ज

G People also view
[11/06, 2:05 pm] Manju: जवळ १ कि.मी लांबवर पसरलेली आहे. पावसाळ्यात सांदण दरीला जाणे अशक्य असते कारण पावसाच पाणी याच दरीतुन खाली कोसळते. त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा. दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो.

दरीत गेल्यावर दोन पाण्याचे पुल लागतात. पहिला पुल २-४ फुट अन दुसरा पुल ४-६ फुट पाण्यात असतो. येथे हिवाळ्यात पण जाऊ शकतो पण पाण्याची पातळी तेव्हा थोडी जास्त असु शकते. सांदण दरीला जाण्यासाठी जाण्यासाठी साम्रद गाव गाठावे लागते. साम्रद ही छोटेखानी आदिवासी वाडी आहे. मुंबईपासुन जवळ-जवळ १५० कि.मी अंतरावर असलेल्या साम्रद गावाला जाण्यासाठी मुंबईहुन नाशिकला जाणारा

महामार्ग पकडायचा. कल्याण-शहा
[11/06, 2:06 pm] Manju: घळ उतरायला लागल्यावर सुरुवातीचा सोपा कातळटप्पा उतरुन आपला आत दरीच्या नाळेत प्रवेश होतो. आत दरीचे सापासारखे लांबच लांब वळण दिसते. काही ठिकाणी १५/२० फूट तर काही ठिकाणी जेमतेम २/३ फूट अशी ही अतिशय अरुंद नाळ असुन दोन्ही बाजूला काळ्याकभिन्न कातळकड्यांनी ती बंदिस्त झाली आहे. एका सपाटीवरुन चालणं फार थोडं आहे. वाट खाली खाली जात राहते, विश्वास बसु नये असे शिलाखंड समोर दिसतात. त्यांच्या मागुन पुढुन वर खाली जाताना गारवा जाणवायला लागतो. हा गारवा वा-याचा नाही, पाण्याचा नाही तर इथपर्यंत सुर्यकिरणंच पोहोचु शकत नसल्यानं थंड झालेल्या दगडांचा आहे. अशातच एका मोठया शिलाखंडाच्या बाजुनं खाली उतरलो की दोन पाणीसाठे आहेत. त्यामूळे तयार झालेल्या अरूंद पात्रातून मार्गक्रमण करत
[11/06, 9:52 pm] Sk: अनोळखी गावात जायचे, अनोळखी लोकांशी संवाद साधायचा, त्यांच्या घरी जायचे, ते खातील ते खायचे. त्यांच्याबरोबर जंगल फिरायचे  असे करता करता मला माहिती तर मिळतच होती. पण तिथल्या माणसांशी एक अनोखे नातेही तयार होत होते. आज माझे इथल्या प्रत्येक गावात हक्काचे घर आणि हक्काची माणसे आहेत. माझ्या अनेक आदिवासी मैत्रिणी आहेत आणि भाऊही. इथे मला कधीच कोणती उपरेपणाची, महिला म्हणून भेदभावाची वागणूक मिळाली नाही. आजही ते माझ्या आणि मी त्यांच्या जीवनातील सहप्रवासी आहोत.  हे सर्व आज आठवले कारण ‘बखर रानभाज्यांची’ लिहतानाचा प्रवास आणि पावसाच्या सुरवातीलाच मिळणारे कोरफड/कात्रुड ही अळंबी. 
कोरफड शोधायचे तर धुंद पाऊस आणि धुक असायलाच हवे. जसे धुके निघते तसे कात्रुड उगवते. जांभूळ किंवा आंब्याच्या जुन्या झाडावर.. उंच डोंगरावरील दाट वनराई.. पावसात चिंब भिजत झालेला हा प्रवास आणि गूढ रानातल्या गप्पा.. असे हे अनोखे कात्रुड बऱ्याच प्रतीक्षेनंतर हाताला लागते तेव्हा.. चेहऱ्यावरचा आनंद आणि कौतुक दोन्ही ! त्यानंतर पारूबाईच्या हातची चुलीवरची भाजी .. अहाहा. 
यांनतर अळंबी शोध सुरु झाला आणि पुस्तकात अळंबी हा स्वतंत्र विभाग तयार झाला. 
#Bakhar_Ranbhajyanchi #बखर_रानभाज्यांची

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...