Sunday, October 24, 2021
गोष्टी-जिद्दी माणसांच्या*
Tuesday, October 19, 2021
माझी आई सौ.हेमलता मधुकरराव पिचड
माझी आई सौ.हेमलता मधुकरराव पिचड
(आदर्श सरपंच ग्रामपंचायत कार्यालय, राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर)
माझ्या आईला प.पू.स्वामी गगणगिरी महाराज यांचे आशिर्वाद मिळाले, त्या अध्यात्मिक संस्काराचा ठसा माझ्या बालमनावर उमटला आणि त्यातूनच मी घडलो. एखाद्या शिल्पकाराने मूर्ती नव्हे तर एखादी लेणी कोरावी असे अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सर्वार्थाने जाणिवेचे संस्कार माझ्यामध्ये आईनेच साकार केले. याच शिदोरीच्या बळावर माझा सामाजिक व राजकीय प्रवास घडला. लहानपणापासूनच माझ्यावर माझ्या आईचे संस्कार असल्याने माझ्या मनात कुणाच्याही विषयीही द्वेषभावना राहिली नाही, ती नष्ट झाली, मनात दुसयांविषयी आपुलकी, प्रेम,आस्था, जिव्हाळा तयार झाला. दुसर्यांना मदत करण्याची वृत्ती व भावना माझ्या मनात बळावली.त्यामुळे मी लहानपणापासूनच माझ्या मित्रांना, नातेवाईकांना प्रेम दिले. उपेक्षितांना न्याय देण्याचे काम केले आहे. जनतेला न्याय देण्याची प्रवृत्ती, सामाजिक बांधिलकी, लोकांना न्याय देण्याची भुमिका 80 टक्के समाजकारण व 20 टक्केच राजकारण मी व माझे सर्व कुंटुब करीत आहे. प्रत्येकाला मदत करण्याची वृत्ती व सतत काम करण्याची सवय मी माझ्या आई-वडीलांकडून घेतली आहे. यातूनच माझ्यातील उपजत असणाऱ्या नेतृत्वगुणाला वाव मिळाला .समाजकारणातूनच राजकारण आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या माध्यमातून तसेच अकोले तालुका एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा व गरीब दिनदुबळयांचे अश्रु पुसून समाजकारण व राजकारण करावे ही भावना माझ्या मनामध्ये माझ्या आईने रुजवली. त्यामुळे तिने सांगितलेले नियमांचे मी काटेकोरपणे पालन करत आहे, म्हणून माझी आई समाधानी आहे. मी राजकारणात येण्यापूर्वी अतिशय मुत्सद्देगिरीने समाजहितासाठी माझ्या आईने मला अध्यात्मिक संस्कार व समाजकारणाचे धडे दिले आहे. त्यामुळे मी राजकारणातही त्याच पध्दतीने काम करीत आहे. घरातील प्रासंगिक दु:खद घटनेच्या वेळी आईने मला धिरोदत्त मार्गदर्शन केले. माझे लहान बंधू कै.जितेंद्र पिचड यांचे दु:खद आकस्मिक निधन झाले त्यावेळी माझे धैर्य फार खचले होते, माझ्या अनुपस्थितीत माझे मोठे भाऊ हेमंत व लहान भाऊ जितेंद्र हे सामाजिक व राजकीय काम करत असत. व मला नेहमी आधार देत असत. माझे लहान बंधू जितेंद्र यांचे आकस्मिक निधन झाल्याने तो आधार अचानकपणे निघून गेल्याने मी एकटा पडलो त्यावेळी माझ्या आईने मला धीर दिला. परमेश्वरकृपेने, प.पू.स्वामी गगणगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने या दु:खातून मी व माझे सर्व कुंटुब बाहेर पडलो व पुनश्च सामाजिक व राजकीय कामात पुन्हा व्यस्त झालो. त्यावेळी आईने मला सांगितले की, तुझा एक भाऊ गेला असला तरी तुझ्या कामातून, तुझ्या वागण्यातून तू अनेक भाऊ तयार कर, तू भिऊ नकोस प.पू.स्वामी गगणगिरी महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठिशी उभे आहेत असा मला माझ्या आईने धीर दिला. त्यामुळेच खया अर्थाने सामाजिक जीवनाचा, राजकारणाचा माझा प्रवास सुरु झाला. माझ्या आईचे माझ्या दोन्ही भावांवर व माझ्यावर प्रचंड प्रेम होते व आहे. माझ्या लहान भावाच्या दु:खद निधनामुळे माझ्या आईच्या मनावर देखील फार परिणाम झाला होता, तिला अतिव दु:ख झाले होते त्या दु:खातूनही आईने आपले दु:ख बाजूला सारुन मला धीर देण्याचे काम केले. तिच्या या आधारामुळेच मी आज राजकारणात व समाजकारणात मार्गक्रमन करत आहे. भावाच्या दुखात असताना अनेकांनी मला धीर दिला असला तरी आईचा आधार हा लाखमोलाचा ठरला आहे.
राज्यात मी राजकीय काम करीत असताना माझा 2019 ला भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर प्रवेश झाला व थोडया दिवसात महाराष्ट्र विधानसभेच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवली. परंतु त्यात माझा पराभव झाला. त्यामुळे मी अक्षरश: खचून गेलो होतो. मी राजकारणातून निवृत्ती घ्यावी की काय? या मनस्थितीत होतो, हा विचार माझ्या मनात आला. मात्र हे माझ्या आईच्या लक्षात आल्याने तिने मला जवळ बोलावून घेऊन सांगितले की, लोकशाहीमध्ये हार-जीत असतेच त्यामुळे तर तिला लोकशाही म्हणतात. जनमानसावर राज्य फक्त पद असल्यानेच करता येते असे नाही. निवडणूक ही एक प्रक्रिया आहे. त्यात ज्या माणसांनी तुझ्या बाजूने कौल दिला त्या सर्वांना न्याय देण्यासाठी समाजहिताची कामे या पुढील काळात सातत्याने करावी लागतील. आपल्या कामाने जनतेमध्ये जावून आपल्या ऊणिवा दूर करण्याचे काम तू कर, तुला यश निश्चितच मिळेल त्यामुळे तू खचून जाऊ नकोस, तू जर खचला तर तुझ्याजवळ व तुझ्या सोबत असलेले कार्यकर्त्यांनी काय करायचं ? त्यांना या संकटात आधार देण्याचे काम तू केले पाहिजे, तुला मिळालेले मते हे दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. त्यामुळे त्यांचा तू विचार कर, आदर कर .आईच्या या सल्ल्याने मी पुन्हा नव्या जोमाने माझ्या कामाला सुरुवात केली.
माझ्या आईने सर्व मुलांना सारखेच प्रेम दिले. वाढदिवस व लग्नसमारंभात लहान व मोठया कौटुंबिक सदस्यांना आनंद देण्याचे काम माझ्या आईने केले आहे. घरातील सणसुद व वाढदिवस या वेळेसही सर्वांना बरोबर घेवून तिने काम केले आहे. भावा-भावांमध्ये समन्वय राखत जा, कुंटुंबातील सणसुद नातेवाईकांच्या समारंभात एकत्र राहून तिथे जाऊन त्यांच्या आनंदात आनंद मानून त्यांना धीर व आनंद देण्याचे काम मला माझ्या आईमुळे करता आले. आमच्या घरातील वाढदिवस व सणासुदीला आमचे तिन्ही चारी कुंटुंब एकत्र येत आम्ही सर्व कौटंुंबिक आदर्श जोपासला आहे.
सामाजाचा पैसा काटसरीने वापरायचा असतो, एक-एक पैसा जमा करायचा असतो, त्यात काटकसर करुन आपल्या कामाचे कसब दाखवायचे असते. यातूनच मी चांगला धडा घेवून बंद पडायच्या स्थितीत असलेला अमृतसागर दूध संघ या संघाचा मी चेअरमन झालो. हा दूध संघ अल्पवधीतच मी चांगल्या नावारुपाला आणला. आज 8 कोटी पेक्षा जास्त हा संघ मी नफ्यामध्ये आणला आहे. याचे कारण काटकसरीने कसे काम करायचे ही शिकवण मला माझ्या आईने दिली. मला कसलेही व्यसन नाही, काटकसर, चांगल्या पध्दतीची वागणी, वायफळ खर्च करायचे नसतो या सर्व गोष्टीतून मी चांगले शिकलो व माझ्या आई-वडीलांची प्रत्येक शिकवण मला कामी आली. अशाप्रकारे सर्व सहकारी संस्थामध्ये व शैक्षणिक संस्थामध्ये मी चांगले काम करणार आहे. आईने मायाममता तर दिलीच पंरतु सामाजिक जीवनात कसे जगायचे, वागायचे, काटकसर कशी करायची, गरीबांना न्याय देण्याचे काम कसे करायचे ही सगळी भुमिका आईने पार पाडली आहे. वडील राजकारणात काम करत असायचे त्यांना पुरेसा कुंटुंबासाठी वेळ देता येत नव्हता. परंतु आईने ती दोन्ही भुमिका पार पाडली, आम्हा सर्व मुलांना संस्कार दिले आमच्या सुखदुखात, आमच्या पालनपोषणात, आमच्या शैक्षणिक जीवनात तिने चांगली भुमिका पार पाडली आहे. आमचे चार कुंटुब आहेत, त्यांचे हायकमांड माझे आई-वडील आहेत. आईच्या अस्तित्वामुळे आम्ही सर्व एकत्र राहतो, समाज व्यवसनापासून दूर कसा राहिल ही आईची शिकवण आहे. निरव्यसनी समाज ही आईची भुमिका, आईचा शब्द हा प्रमाण मानला जातो, चारही कुंटुंबात देवभक्ती वाढविणे, निरव्यवनी राहणे हे धडे आईकडून आम्हा सर्वांना मिळाले आहे. माझे व भावाचे शिक्षण भोसला मिलिट्री स्कुल नाशिक येथे झाले आहे. लहान पणापासूनच कष्ट, साहेबांच्या पाठिमागे भक्कमपणे उभा राहिलो, लहानपणापासूनच अगदी 10 वी मध्ये असल्यापासूनच शेतावर जाणे, साहेबांनी सांगितलेले काम व्यवस्थितपणे करणे. बालपणापासून ते शिक्षण, सामाजिक काम, राजकारणात काम करणाताना अनेक संकटे आले, अनेक प्रश्न उभे राहिले, त्यातूनही मार्गक्रमन करीत आजवर इथेपर्यंतचा प्रवास चालू राहिला यातून मला अनेक चांगले मित्र व कार्यकर्ते मिळाले आहेत. संस्कार
माझी आई ही माझ्यासाठी सर्व काही आहे आणि माझ्यासाठी देव सुद्धा आहे. माझ्या आईने लहानपणापासून मला चांगले संस्कार देऊन मला घडवले आहे. जर मला काही लागलं तर ओठावर येणार पहिला शब्द म्हणजेच – आई.
तसेच संकटाच्या वेळी साथ देणारी आणि दुःख सोसून सुखात ठेवणारी आई असते. माझी आई हि माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कारण ती आपल्या सोबत राहून किती जबाबदारी पार पडत असते.
माझी आई जर का आजारी पडली तर आम्हा सर्वाना संपूर्ण घर आजारी पडल्यासारखं वाटतं. तेव्हा असं वाटतच नाही कि, हे आपलं घर आहे. माझी आई नेहमी जी कामे करते ती कामे इतर कोणालाही करून संपत नाही
आई मायेचा सागर
आई हि मायेचा सागर आहे. या विषयावर अनेकांनी काव्ये आणि निबंध लिहिले आहेत. रामायणात प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितले होते की" जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी " स्वर्णमयी लंकेपेक्षा आणि स्वर्गापेक्षा आपली अयोध्या या जन्म भूमीला सर्वश्रेष्ठ मानले आहे.हे सांगताना त्यांनी आपल्या जन्मभूमीची बरोबरी आईशी केली आहे.
मराठीमध्ये प्रसिद्ध कवी यशवंत यांनी आपल्या कवितेमध्ये स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी हि ओळ लिहून आईची महानता वर्णविली आहे.
आईच्या समाजकारणाची दिशा अतिशय योग्य असल्याने तिने दिलेल्या सामाजिक आदेशाची अंमलबजावणी डोळे झाकून जरी केली तरी ते नेहमी समाजहिताचे ठरले. आदर्श सरपंच असताना आईने वसुंधरा पुरस्कार मिळवताना केलेले काम हे फक्त मानवजातीच्या कल्याणाचे आहे. राजूरच्या चौतर्फा लावलेली झाडे उद्या निश्चित वनराईचे स्वरूप प्राप्त करतील नेहमीच समाजहित व मानवजातीचे कल्याण हा सामायिक हेतू ठेवून समाजकारण व राजकारण करण्याचे धडे तिने मला दिले. निश्चितच तिच्या तत्त्वांनी केलेला प्रवास हा मला फलदायी ठरेल यात कुठलीही शंका नाही.
🍂 ' गावच्या विकासात्मक राजकारणाची बाब सोडल्यास आईने कधीही तालुका , जिल्हा अथवा राज्याच्या राजकीय घडामोडीं संदर्भात मतप्रदर्शन केले नाही . मोठ्या पदांकरिता हस्तक्षेप केला नाही .
🍂 व्यसनमुक्ती , वृक्षसंवर्धन - वनक्षेत्र वाढीस लागावे यासाठीची तळमळ , ग्रामस्वच्छता मोहीम याबाबत मात्र आईने गावच्या विकासकामांसाठी फार मोलाची कामगिरी करुन वेळ दिला आहे .
🍂 घरातील माणसांसाठी ती कायमच प्राधान्यक्रमाने सर्वप्रथम मोलाचा भावनिक आधार राहिली आहे . शक्यतो सामंजस्याने - सौजन्यशील भावनेतून कोणतीही समस्या सोडविण्यावर आईचा कटाक्ष असतो .
🍂 संस्कार हे सहजगत्या रुजविण्याचा आईंचा प्रयत्न असतो . कोणताही जाणीवपूर्वक घटनाक्रम दिखाऊपणातून नसतो किंवा मग अहंकार देखील नसतो की आपण संस्कार जोपासतो आहोत असा !
🍂 साधेपणा - निगर्वी स्वभाव , प्रयत्नवादी भूमिका , अंत:करणातील तळमळ , जपलेली जिव्हाळ्याची नाती हे सद्गुण आईचे बलस्थान आहेत ..
शब्दांकन - मा.आ.वैभवराव मधुकरराव पिचड
@@@@
Sunday, October 17, 2021
प्रधानमंत्री वनधन विकास योजना’ व ‘शबरी आदिवासी
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ‘आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थे’ने ‘प्रधानमंत्री वनधन विकास योजना’ व ‘शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा’च्या माध्यमातून सुरु केलेल्या ‘वनधन केंद्रा’मार्फत गौणवनउपजावर प्रक्रिया करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.
या संस्थेला आता १ कोटी, ५७ हजार रूपयांचा गुळवेल पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. यामुळे वनवासी समूहातील कुटुंबीयांना आर्थिक उत्पन्नाचा शाश्वत मार्ग सापडला आहे.
वैदिक काळापासून आपल्या देशात वनौषधींचा वापर होत आलेला आहे. मुख्य म्हणजे ऋषिमुनींनी ’आयुर्वेद’ ही जगाला दिलेली देणगी आहे. जंगल ही वनौषधी निर्मितीची मुख्य केंद्र आहे.
भारतातील जंगलात सुमारे ४५ हजार वनस्पतींचे प्रकार आढळतात. शतावरी, अश्वगंधा, सर्पगंधा, अडुळसा, कळलावी, सफेद मुसळी, वेखंड, ब्राह्मी, गुळवेल, गुंज, वावाडिंग, रक्तचंदन, बिवळा, बिबा, हिरडा, बेहडा, आवळा, बेल, ऐन, सीताअशोक, अर्जुन, केवडा त्यातीलच काही वनस्पती आहेत. आजही वनवासी समूह आपला उदरनिर्वाह या उपजांच्या माध्यमातून करत असतात.
सध्या कोरोना संकटामुळे वनौषधींना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलती जीवनशैली, तणावाखालील जीवन, ‘फास्ट फूड’, दूषित वातावरण यामुळे अनेक रोग निर्माण झाले असून त्याच्या उपचारांवर औषधी वनस्पतीला विशेष महत्त्व आहे.
–
हे ही वाचा – तंत्रज्ञानाची कास धरून हा स्मार्ट शेतकरी घरबसल्या २०० एकर शेतावर ठेवतोय लक्ष!!
–
जागतिक पातळीवर वनौषधींना मोठी बाजारपेठ आहे. आता जगातील अनेक देशही त्याकडे आकर्षित झाले आहेत. जागतिक बाजारपेठेत वनौषधींची मागणी १४ अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक आहे. या बाजारपेठेत चीनचा वाटा १९ टक्के आहे, फ्रान्स ६० टक्के, जर्मनी सात टक्के, तर भारताचा वाटा मात्र नऊ टक्क्यांवर आहे. मात्र, केंद्र सरकार वनौषधींचे उत्पादन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
आदिवासी डोंगराळ भागातील अनुसूचित जमातींच्या कुटुंबांचे आर्थिक जीवनमान सुधारण्यासाठतीं ‘शबरी वनवासी वित्त व विकास महामंडळ’ व ‘केंद्रीय जनजाती केंद्रीय मंत्रालय (ट्रायफेड)’ यांच्या मार्फत ‘पंतप्रधान वनधन योजना’ प्रभावीपणे राबविली जात आहे. देशात ११०० वनधनकेंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ‘आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन’ने कोकण विभागात रायगड १५, रत्नागिरी ९, ठाणे १५ आणि पालघर जिल्ह्यात ३० प्रस्थापित वनधन विकास केंद्रे मंजूर केली आहेत. सध्या वन गौण उपज संकलन करण्याचा हंगाम सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ‘आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्थे’ला वनधन केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे.
ध्येयवादी तरुणांमुळे घडून आला बदल
शहापूर तालुक्यातील खरीड या वाडीत कातकरी समूह मोठ्या प्रमाणात राहतो. दीड वर्षांपूर्वी रोजगारासाठी इथला कातकरी बांधव शहरात स्थलांतर करत असे. महिला वीटभट्ट्यांवर काम करत.
आर्थिक अडचणींमुळे अनेकांच्या इच्छा आणि गरजाही पूर्ण होत नसत. आर्थिक परिवर्तन घडवून आणल्याशिवाय समाजाला स्थिरता प्राप्त होणार नाही, हे वाडीतील २७ वर्षीय सुनील पवार या तरुणाने ओळखले.
दहा-बारा तरुण सजग मित्राच्या मदतीने ‘आदिवासी एकात्मिक विकास संस्थे’ची स्थापना केली. यामुळे कातकरी समूहात नवी जाणीव जागृत निर्माण झाली.
सुनील यांनी मोठ्या कष्टाने शिक्षण घेतले आहे. त्यांचे विचार व त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. कातकरी समूहाचा उत्कर्षाचा मार्ग कसा गवसला, याविषयी सांगताना सुनील म्हणतात, “माझं बालपण खरीड या कातकरी वाड्यावर गेलं. आईवडील वीटभट्टी व खडी फोडण्याचं काम करत.
पाड्यावरचे सर्वच लोक रोजगाराच्या शोधात शहरात स्थलांतर करत. हे वास्तव मी लहानपणापासून पाहत होतो. पुढे काही सामाजिक संस्थेच्या ओळखी झाल्या. त्यांचे काम पाहून मी ‘आदिवासी एकात्मिक विकास संस्थे’ची स्थापना केली.
एकदा मी नाशिक इथे ‘वनवासी भवना’त ‘प्रधानमंत्री वनधन विकास योजने’ची माहिती घेतली. ‘शबरी आदिवासी मंडळा’चे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांनी विश्वास दाखवून वनोउपज जमा करण्यास प्रोत्साहित केले. पहिल्यांदा २९ कातकरी मुले या कामाशी जोडलो गेलो. आता ८५ कातकरी वाड्यावरचे दोन हजार कातकरी या कामात सहभागी झाले आहेत.”
सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे डॉ. दिगंबर मोकाट (वनशास्त्र विभाग) प्रशिक्षण देतात. ठाणे येथील ‘मजूर फेडरेशन’चे संचालक अरूण पानसरे यांनी विनामोबदल्यात संस्थेच्या कार्यालयासाठी जागा दिली.
सहा ‘वनधन केंद्रां’ची स्थापना
शहापूर तालुक्यातील ३०० कातकरी कुटुंब ‘वनधन केंद्रां’शी जोडली गेली आहेत. शहापूर, मोखावणे, ढाकणे, वेहळोली, खरीड व अल्याणी या सहा आदिवासी पाड्यांवर ‘वनधन केंद्र’ सुरू आहेत.
सर्व केंद्रांना सरकारकडून अर्थसाहाय्य मिळाले आहे. केंद्रांच्या माध्यमातून पळस, रुई, आघाडा, पिंपळ, शमी, खैर, उंबर, दर्भ, दुर्वा अशा नवग्रह समिधा विक्री होते, तर हिरडा, बेहडा, आवळा, गुळवेल, मोहफुले, शिकेकाई, गोखरू, नागमोथा असे जवळपास ३५० वनोउपज खरेदी व विक्री केले जातात.
महिलांसाठी बचत गट स्थापन करून पत्रावळी प्रशिक्षण दिले जाते. मेणबत्ती व अगरबत्ती तयार करणे, पापड बनविणे, औषधी, पावडरी तयार करणे अशी विविध प्रशिक्षणे या केंद्राच्या माध्यमातून दिली जातात.
या ‘वनधन विक्री केंद्रां’तून अनेक मोठे उपक्रम चालवले जातात, तसेच गुळवेल पावडरसह ३५ हून अधिक उत्पादनांची व प्रक्रिया केलेल्या पदार्थांची विक्री होते. आज अनेक महिला मुंबई येथे वनोउपज घेऊन जात असतात. त्यामुळे महिलांचे स्थलांतर थांबले आहे.
गुळवेलातून रोजगार निर्मिती
गुळवेल ही महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. तिचे खोड अनेक रोगांवरील औषधांत वापरतात. त्यामुळे बाजारात यास मोठी मागणी आहे. विषाणूजन्य ताप आणि मलेरियासारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी या वनौषधीचा मोठा उपयोग होतो. त्याशिवाय मधुमेहावरदेखील हे प्रभावी औषध मानले जाते. त्याचा अर्क, द्रव, भुकटी किंवा मग त्याचा गर काढून वापरला जातो.
–
हे ही वाचा – दूरदर्शनवरील एका सिरीयलचा असाही परिणाम: शेतकरी झाला मशरूमचा राजा!
–
सुनील पवार सांगतात की, “गुळवेल पावडर बनवण्याच्या या प्रक्रियेत कातकरी बांधव स्वतः झाडावर चढून गुळवेल तोडून घेतात. त्यानंतर आठ ते दहा दिवस ती सुकवली जाते. ही सुकवलेली गुळवेल शहापूरसारख्या मध्यवर्ती ठिकाणी आणून दळून घेतली जाते. नंतर त्याची पाकिटे बनवून, शिक्के मारून अनेक दुकानांच्या माध्यमातून खरेदीदारांना विकली जाते. २०२० वर्षी ३४ टन, तर यंदा जवळपास १०० टनांपेक्षा गुळवेल संकलन करण्यात आले आहे.
गेल्या दीड वर्षांत या संस्थेने १२ लाख, ४० हजार रुपये किमतीची गुळवेल पावडर विकली आहे, तर सहा लाख दहा हजार रुपयांची कच्ची गुळवेल विक्री केली आहे. मार्च २०२० ते २०२० जूनच्या मध्य या कालावधीत ‘वनधन विकास केंद्र , शहापूर’ने स्थानिक आदिवासींकडून ३४०० टनाहून अधिक गुळवेल खरेदी केली आहे. प्रत्येक महिन्याला तीन ते चार लाखांची विक्री होत असते.
दीड कोटींच्या ‘ऑर्डर्स’
संस्थेने ‘डाबर’, ‘बैद्यनाथ’, ‘हिमालय’, ‘विठोबा’, ‘शारंगधर’, ‘भूमी नॅचरल प्रॉडक्ट्स’ यासारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना गुळवेल विक्री केली आहे. सुनील सांगतात, “वनधन केंद्र व शबरी आदिवासी महामंडळाच्या सहकार्यामुळे गुळवेल पावडर व कच्च्या मालाची विक्री होत आहे.”
यंदा कोरोनाच्या संकट काळातही हिमालया (३०० टन), डाबर (२५० टन), भूमी नॅचरल प्रोडक्ट्स कंपनी (४००टन) यासारख्या नामवंत कंपन्यांनी १ कोटी, ५७ लाख रुपयांच्या गुळवेल पुरवण्याच्या ऑर्डर्स दिल्या आहेत. स्थानिक बाजारपेठा आणि औषधी कंपन्यांपुरते मर्यादित न राहता आम्ही ‘डी-मार्ट’सारख्या मोठ्या किरकोळ साखळ्यांच्या मदतीने गुळवेलीला दूरच्या बाजारपेठेत नेण्याची योजना आखली आहे.
आम्ही एक संकेतस्थळही तयार करत आहोत. ‘लॉकडाऊन’ कालावधी दरम्यान ‘ऑनलाईन’ विक्री त्याद्वारे होत आहे. उत्पादनांची वाहतूक आणि विक्री कोणत्याही अडथळ्याविना करता यावी आणि म्हणून आम्हाला पास देण्यासाठी सरकार मदत करत आहे.”
दोन लाख गुळवेल रोपांचे उद्दिष्ट
एकेकाळी कातकरी बांधव गुळवेलाचा सरपण (जळण) म्हणून वापर करायचे, आता हेच बांधव गुळवेलाचा एकेक तुकडा जमा करण्यासाठी धडपडत आहेत. एकूणच कातकरी बांधवांना गुळवेलाचे महत्त्व लक्षात आले आहे.
गुळवेल या औषधी वनस्पतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी दोन लाख रोपांची लागवड करण्याचे नियोजन केले आहे, असेही पवार यांनी सांगितले.
वनौषधी उद्योगात संधी
कोकण, विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रात त्या त्या मातीचे गुणधर्म लक्षात घेऊन वनौषधी शेती विकसित करण्यासाठी सरकार व स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळे त्या त्या भागात वनौषधी आधारित छोटे उद्योग उभे करण्यास संधी राहणार आहे, असे सुनील पवार यांनी सांगितले.
–
हे ही वाचा – छंदाचे रुपांतर व्यवसायात करून, महिन्याला ३० हजार रुपये कमावणाऱ्याची भन्नाट कथा
–
सरकारने काय करावे?
१) वनौषधी लागवड करणार्या शेतकर्यांना संघटित करणे.
२) महाराष्ट्रातील शेतकर्यांना वनौषधी शेतीचे महत्त्व पटवून देणे आणि वनस्पतींची लागवड करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
३) औषधी वनस्पतींची व्यापारी तत्त्वावर शेतीत लागवड करताना उत्तम बियाणे, अनुकूल वातावरण व तांत्रिक माहितीची आवश्यकता उपलब्ध करून देणे.
४) औषधी वनस्पतींची लागवड करणारे शेतकरी, आरोग्यतज्ज्ञ आणि विविध औषधी उत्पादक कंपन्यांमध्ये नियोजनबद्ध समन्वय साधणे.
आदिवासी कातकरी समूहाच्या ‘वनधन केंद्रा’ची ही यशोगाथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर संकल्पने’चे हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून समोर येत आहे.
विकास पांढरे,९९७०४५२७६७
अधिक माहितीसाठी संपर्क – सुनील पवार (अध्यक्ष, आदिवासी एकात्मिक सामाजिक संस्था, शहापूर जि.ठाणे) मो.नं:-+91 7378956592
ईमेल: adivasiass@gmail.com sunil.pawar.sp129@g
Saturday, October 16, 2021
तालुक्यातील गणोरा येथील शेतकरी देविदास वाकचौरे व संजय. वाकचौरे या शेतकरी पिता पुत्रांनी जैविक शेती
माझी आई सौ.हेमलता मधुकरराव पिचड (आदर्श सरपंच ग्रामपंचायत कार्यालय, राजूर, ता.अकोले, जि.अहमदनगर)
वन्यजीवांचीही आबाळ
Swami Amazing Saturday, June 18, 2011 वन्यजीवांचीही आबाळ राजूर, १८ जून/वार्ताहर अकोले तालुक्यातील रतनगड, हरिश्चंद्रगड व कळसूबाई शिखर परिस...
-
अकोले - भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसर एका बाजूला डोंगरची रांग , दुसऱ्या बाजूने खोलवर दरीतून वाहणारी अमृतवाहिनी प्रवरा नदी डोंगराच्या पोट...