Sunday, September 21, 2025

हरिश्चंद्रगड चा कास पठार फुलला

हरिश्चंद्रगड चा कास पठार फुलला
अकोले,ता.२१:हरिश्चंद्रगड रानफुलांनी बहरलाय मग कधी भेट देताय. आपल्या लाडक्या हरिश्चंद्र गडाला,आम्ही आहोतच तुमच्या स्वागताला.असे फ्लेक्स बोर्ड स्थानिक व्यवसायिक लावून पर्यटकाना व निसर्ग प्रेमीना साद घालत आहेत। पावसाळा सुरु झाला की सह्याद्रीच्या पठारावर डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातीची ,रंगांची, आकाराची ही फुल आपल लक्ष वेधुन घेतात. सप्टेंबर अखेर पर्यंत त्या फुलांची चादर सर्वदुर पसरलेली दिसायला लागते. काही तासांच ते दिवसांच आयुष्य असलेली ही फुल डोंगर भटके आणि अभ्यासकांपुढे आपल भांडार उघड करतात. सह्याद्रीतील फुल म्हटली की सर्वांच्या नजरेसमोर पहिल्यांदा येत ते हरिसचंद्रगड पुष्प पठारावर पाउस पडायला लागला की दर महिन्यात वेगवेगळी फ़ुल फ़ुलायला लागतात. पणपाऊस पडायला सुरुवात झाली की जमिनीवर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फ़ुटायला लागतात. जमिन हिरवीगार दिसायला लागते. पाउस पडल्या - पडल्या सर्वप्रथम हजेरी लावतात ती पाण कुसुमची फ़ुल. त्यानंतर काळी मुसळीची चांदणी सारखी दिसणारी पिवळी फ़ुल हजेरी लावतात. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ती मुळासकट उपटली जातेय. मग येते आषाढ आमरी, आमरी म्हणजे इंग्रजीत ऑर्किड. ती येते तेंव्हा गवत जास्त वाढलेल नसते त्यामुळे त्याची पांढरी सुंदर फ़ुल त्या हिरव्या गालिच्यावर उठुन दिसतात. एकदा एका पावसाळी संध्याकाळी एका पठारावर विसावलेलो. पावसामुळे वातावरण कुंद होत. संध्याकाळच्या कमी होत जाणार्‍या प्रकाशात गवताच्या वर डोलवणार्‍या दांड्यांमधुन आषाढ आमरीची फ़ुल फ़ुलायला लागली आणि काही वेळातच ते पठार त्या पांढर्‍या फ़ुलांनी चमकायला लागल. या फ़ुलांमधे पण गमती जमती असतात. पाउस पडल्यावर "हबे आमरीच्या" कंदातुन एक दांडा बाहेर येतो त्यावर पांढरी फ़ुल येतात. त्यानंतर त्याला जमिनी लगत एकच मोठ पान येत. परागीभवन झाल की फ़ुल गळुन पडतात. पानात तयार झालेल अन्न कंदात साठवल जाते ते पुढच्या पावसाळ्यासाठी. ऑगस्ट, सप्टेंबर मधे तेरड्याची फ़ुल आणि सोनकीने सह्याद्रीची पठार झाकली जातात, रस्त्यांच्या कडेला, दाट झाडीत जागा मिळेल तिथे पेवची बेट फ़ुलायला लागतात. हा पुष्प सोहळा सह्याद्रीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत चालु असतो.   कोट - आमच्या हरिसचंद्रगड पठार बेटावर नवरात्रीच्या स्वागतसाठी पिवळीधमक सोनकीने पठाराची शोभा वाढवली आहे .तिच्याबरोबरच गुलाबी,निळसर,पांढरी विविधरंगाची व विविध नावाची फुले तिला साथ देत आहे .तेव्हा पर्यटकांनी निसर्गप्रेमींना एकदा हरिशचंद्र गड परिसराला भेट दयावी भास्कर बादड (सरपंच पाचनई)

No comments:

Post a Comment

चिंचोडी ग्रामसेवक मेडिकल रजेवर असतानाही चेकवर सह्या करून पैसे काढले

अकोले,ता.२३:ग्रामस्थानी बोलावलेल्या ग्रामसभेकडे पाठ फिरवून ग्रामविकास अधिकारी याने कार्यलयात जाऊन सरपंच यांचे सांगण्यावरून चक्क केल्या जुन्य...