Monday, July 15, 2024

भंडारदरा परिक्रमा म्हणजे पर्यटनाची उच्च अनुभूती

सकाळ विशेष शांताराम काळे अकोले, ता. १६ : सहाद्रीच्या कुशीत सुमारे साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराजीच्या खोबनीत वसवलेला सुंदर जलाशय म्हणजेच विल्सन डॅम (भंडारदरा धरण) ब्रिटिशांनी १९९० मध्ये धरणाच्या बांधकामाला सुरवात केली आणि ते १९२६मध्ये पूर्ण झाले. ब्रिटिशांनी धरणाची जागा निवडताना दाखविलेली रसिकता वाखाणण्याजोगी आहे. इथल्या पर्वतराजीमुळे परिसराला 'प्रतिकाश्मीर' म्हटले जाते. म्हणूनच या परिसरात पावसाळी सहलीसाठी पर्यटकांचों गर्दी होते. धरणाची परिक्रमा करणे म्हणजे पर्यटनानंदाची उच्च अनुभूतीच! भंडारदरा धरणाच्या परिसरात दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा म्हणजे बालाघाट. राकट कातळाच्या पिंगट करड्या रंगाची ही डोंगररांग ऋतुमानाप्रमाणेन तिचे सौंदर्यही बदलत जाते. कधी काळचे थंड हवेचे ठिकाण म्हणून पर्यटक इथे भ्रमंती करायचे, आता पावसाळी पर्यटनाचा आनंद येथे लुटला जातो. पावसाळ्यापूर्वी काजवा महोत्सव सरता ग्रीष्म आणि वर्षाऋतूंच्या आगमना अगोदरच्या संधिरुतूत या परिसरातील सादाडाची झाडे प्रकाशमान होतात. काजव्यांचे पुंजके इथल्या झाडांवर वास्तव्याला असतात, या काळात झाडांवर जनू चांदण्याचे संमेलन भरल्याचा भास होतो. त्याला काजवा महोत्सव म्हटले जाते. खरे तर लवकरच येणाऱ्या कृष्णजलदाच्या आगमनाची चाहूलच हे काजवे देतात. पावसाला सुरवात होताच त्यांचे जीवनचक्र संपते वर्षाकाला सुरवात झाली, की इथल्या काळ्या कातळाचा रंगही बदलू लागतो, संपूर्ण डोंगरावर हिरवाईची शाल पसरू लागते. जसजसे पावसाचे प्रमाण वाढते, तसतसे या पर्वतरांगांचे सौंदर्य खुलू लागते. डोंगरापलीकडून येणारे कृष्णमेघही या उतुंग शिखरांवर विसावतात. रेंगाळणाऱ्या मेघांमध्ये शिखरे, डोंगरवाटा लुप्त होतात. मेघदुलई बाजूला होताच डोंगरांच्या फटीतून कोसळणारे शुभ्र फेसाळनारे धबधबे नजरेस पडतात. लोभस 'अम्ब्रेला फॉल' भंडारदरा धरणाच्या अतोकडे १० किलोमीटरवर रंधा धबधब्याचे दर्शन पडायचे; मात्र आता कोदनी जलविद्युत३२मेगा वॅट प्रकल्पासाठी पाणी अडविल्यानेहा धबधबा अकसल्यासारखा कोसळतो असे वाटते, . त्यामुळे हल्ली धबधबा पाहायला मिळणे या भागातील पर्यटकाना अलभ्य लाभच। भंडारदरा जलाशय भरले, की अतिरिक्त पाण्याचा विसर्ग धरणाच्या भिंतीलगतच्या अर्धगोलाकार खडकावरुन सोडला जातो. फेसाळणाऱ्या या धवलधारा छत्रीसारखा आकर धारण करत वहू लागतात. म्हणूनच त्याचे नाव 'अम्ब्रेला फॉल' ठेवण्यात आले. या धरणाखाली एक छोटेखानी पूल आहे. पर्यटकांना या पुलावर जाऊन तुषाररस्नान घेता येते. त्यामुळे 'अम्ब्रेला फॉल' लोभस झाला आहे. इथेही ब्रिटिशांच्या रसिकतेला दाद द्यावी तितकी थोडीच महाराष्ट्राची चेरापुंजी परिक्रमेला धरणाच्या उजव्या बाजूच्या रस्त्याने सुरवात करता येते. या भागातला प्रवास सुरू होतो, तसतसा निसर्ग आपल्याला त्याच्या कुशीत सामावून घेऊ लागतो. जलाशयाच्या बाजूने वळणे घेत घेत प्रवास करताना समोरच्या संततधार पाऊस, मेघांच्या दाट दुलईत अदृश्य होणारा रस्ता पार करताना आपसूकच ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा..' या ओळी ओठांवर येतात, रतनगडाच्या डोंगरमाथ्यावरील एका गुहेत प्रवरा नदीचा उगम आहे .धरणापासून साधारण सात किलोमीटर आत गेल्यानंतर पांजरे नावाचे छोटेखानी गाव आहे. इथून कळसूबाई शिखराचे दर्शन घडते. 'महाराष्ट्राचे एव्हरेष्ट मानल्या जाणाऱ्या कळसूबाई येथून किंवा पलीकडच्या बारी गावातून चढाई सुरू करता येते. पांजरे गावातून पुढे घाटघरकडे जाता येते, पांजरे,घाटघर ,रतनवाडी ही गावे महाराष्ट्रातील चेरापुंजी मानली जातात एकदा पाऊस सुरू झाला, की चार-सहा दिवस अविश्रांत कोसळने ठरलेलेच, घाटघरच्या कोकणकडावर उभे राहून खाली डोकावले, की खोल दरीतल्या उदंचन जलविद्युत प्रकल्प नजरेत भरतो. एका बाजूला छातीत धडकी भरविणारा कोकणकडा वेगाने रोरावणाऱ्या वाऱ्याचा नाद पर्यटकांना भुरळ घालतो. घटघरच्या घाटनदेवी मंदिर परिसरातून दिसणारा सूर्यास्तही डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. साम्रदची सांदण घाटघर कडून सांदण मार्गे रतनवाडीकडे जाताना साधारण एक किलोमीटर आडवाटेत सांदण आहे. पावसाचे तडाखे वर्षानुवर्षे झेलल्याने खडकावर आकाराला आलेल्या नानाविध रचना, कोकणकडाचे रौद्र रूप, कधी साहसला साद घालणारे सुळके तर कधी रांजणखळगे ..असा अनेक नैसर्गिक कला कृती येथे साकारल्या आहेत. . एक किलोमीटर लांबीच्या सांदणीची रुंदी साधारण५० फूट आहे. रतनगडाच्या पोटातून येणारा ओढा हा सांदणीतून वाहतो .त्यातील मोठमोठ्या शिळा साहसी पर्यटकांना साद घालतात अर्थात, पावसाळ्यात सांदणीत उतरणे धोक्याचे असते. अचानक पूर आला, तर आसरा घेण्यास सांदनीमध्ये जागा नाही. साम्रद पासून रतनवाडी येथे पोहचल्यावर इस इसन पूर्वीचे शिवकालीन हेमाडपंती शिवमंदिर पाहायला मिळते तर तेथूनच पुढे दक्षिणेला रतनगड आहे . रतनगड मार्गे भंडारदरा कडे निघताना काळ्या कातळावरून पांढरे शुभ्र ,नाणी फॉल,नेकलेस फॉल,कोलटेम्भे येथील बाहुबली फॉल पाहताना पर्यटक हरखून जातात धबधबे पाहत मुतखेलमार्गे धरणाचाजवळ पोचता येते. या ठिकाणी आपली संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते. या सर्व प्रत मुतखेलजवळच्यया डोंगरमाथ्यावरून पडणारे पायथ्याशों न पोचत वाऱ्यामुळे हवेतच विरतानाचे दृश्य पर्यटकांना थांबण्यास भाग पाडते काही ठिकाणी एकमेकांना बिलगुन उभी असलेलो कौलारू घरे इथल्या आदिवासी संस्कृतीचे येथे दर्शन घडवितात.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...