Saturday, June 22, 2024

मी लढलो मी जिंकलो आमदार डॉ .किरण लहामटे

मी लढलो मी जिंकलो आमदार डॉ .किरण लहामटे व्हिजन पर्यटनाचे, अकोल्याच्या विकासाचे ! अकोले,(शांताराम काळे)माझे वडील शाळा मास्तर लव्हाळी ओतूर हे माझे खेडे गाव आदिवासी व दुर्गम पहिल्यापासून शिक्षणाची आवड असल्याने खेड्यात चौथीपर्यंत शिक्षण नंतर राजूर,अकोले,नगर,पुणे येथे शिक्षण घेऊन डॉक्टर झालो आदिवासी भागात रुग्णांचे होणारे हाल पाहून आदिवासी भागातच वैधकीय व्यवसाय राजूर येथे सुरू केला ,व्यवसाय करत असताना सामाजिक कामाची आवड सर्वरोग निदान शिबीर भरवून गरीब रुग्णांची सेवा केली .समाज कारणातून मनसे संघटनेशी संपर्क आला व तालुक्यात मनसे चे काम सुरू केले .२०१४नंतर राजूर येथे जिल्हा परिषद निवडणुकीत उभा राहिलो तत्पूर्वी मनसेतून भाजप पक्षात प्रवेश केला होता .विजयी झालो त्यानंतर खऱ्या अर्थाने मी राजकारणात आलो .पुन्हा जिल्हा परिषद सातेवाडी गटातून भाजप पक्षातून विजयी झालो नी माझा चढता आलेख सुरू झाला .मी आमदार होईल का ?याबाबत अनेकांना शंका होती .मात्र माझा मार्ग पिचड पितापुत्रांनी सुकर केला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मी शरदचंद्र पवार यांना भेटून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला व मला विधानसभेचे तिकीट मिळाले तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने मला पाठिंबा व्यक्त करत लोकवर्गणी काढून मला नोट दिली व मते दिली त्यामुळे मी प्रचंड मताने निवडून आलो चाळीस वर्षाची सत्ता व प्रस्थापित राजकारण संपविले राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले त्यात दुर्दव्य असे की कोरोना आल्याने अडीच वर्षे विकास कामे करता आली नाही .विकास कामासाठी संघर्ष करावा लागला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० शिवसेनाआमदार घेऊन शिवसेनेला सोडचिट्ठी दिल्याने राज्यातील आघाडी सरकार पडले व महायुतीचे सरकार आले त्यामुळे आणखीनच अडचण झाली राष्ट्रवादी चे नेते अजितदादा यांना सर्व आमदारांनी विकास निधी मिळत नसल्याची तक्रार केली व राष्ट्रवादी पक्षानेही सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र मी तालुक्याच्या जनता व कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन कोणता निर्णय घ्यावा असे विचारूनच अजितदादा यांच्यासोबत गेलो त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाला उपमुख्यमंत्री पद व अर्थ खाते मिळाले मुळे तालुक्याचा विकासाचा मार्ग मोकळा झाला ,जिथे तीन चार कोटी मिळायचे तिथे १८००कोटी रुपयांचा निधी तालुक्याला मिळाला ,रस्ते,सभागृह,शाळा,ग्रामपंचायत,अंगणवाडी,प्रत्येक गावात विकासाची कामे पोहचली याचे मला समाधान आहे .तालुक्यातील वाडी वस्ती मध्ये रस्ते वीज पोहचली गेल्या चाळीस वर्षात विकास झाला नाही तो विकास माझ्या माध्यमातून झाला याचे समाधान आहे . लवकरच तालुक्यात औद्योगिक वसाहत व टोलार खिंड ही कामे मार्गी लावू हा विश्वास आ. डॉ. किरण लहामटे यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केला आहे . तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा मायबाप जनता आपणाला निवडून देईल तिरंगी होऊ द्या नाही तर चौरंगी विजय आपलाच असेल असेही ते म्हणाले अकोले तालुक्यात असलेली नैसर्गिक साधन संपत्ती आणि गड किल्ले, डोंगर दऱ्या, धरणे यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यात पर्यटन वाढीस मोठा वाव आहे. यातून स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होऊ शकते, यासाठी या पर्यटनस्थळांचा विकास करण्याबरोबरच रस्ते दळणवळणाची साधने पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच पर्यटनवाढीसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून लवकरच या माझ्या तालुक्यात ही संकल्पना राबविणार असून पर्यटन हा तालुक्याचा आत्मा असल्याचे अकोले विधान सभा मतदारसंघाचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी म्हटले आहे. अहमदनगर जिल्ह्याचे काश्मिर समजल्या जाणाऱ्या या माझ्या अकोले तालुक्याची पर्यटनाच्या दृष्टीकोनातून एक नवी ओळख आपल्याला निर्मान करायची आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात यास मोठा वाव तर आहेच, पण मुळा- आढळा- प्रवरा खोऱ्यातही ही संधी आहे. ब्रिटीशकालीन भंडारदरा धरणाचा रिंगरोड एक वेगळ्या पद्धतीने तयार करायचा असून या रस्त्यावर असणारे विविध धबधबे व त्याचबरोबर साम्रद येथील रिव्हर्स फॉलसारखे आगळे वेगळे पॉइंट सुशोभित करायचे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठी 'सांदन दरी' इथे ही विविध सुविधा पर्यटकांना निर्माण करावयाच्या असून घाटघरचा कोकणकडा, कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यातील विविध पक्षी, प्राणी पाहण्यासाठी पर्यटकांना ओपन सफारी गाडीची व्यवस्था करणे, भंडारदरा धरणात बोटींगसाठी स्थानिक आदिवासी तरुणांना आधुनिक बोटी खरेदी करून देणे. पर्यटनासाठी स्थानिक रानमेवा असणारे करवंदे, आवळे, हिरडा-बेहडा वर प्रक्रिया करणारे छोटे छोटे उद्योग उभारण्यासाठी स्थानिक आदिवासींना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात गड, किल्ले असून यांची म्हणावी इतकी प्रसिद्धी झालेली नाही. साठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून त्याठिकाणी पर्यटकांना विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करायच्याआहेत, तसेच अकोले तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीही एक माहिती पर्यटन केंद्र उभारण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरवठा सुरू आहे. अकोले तालुक्यात पर्यटकांचे आकर्शन ठरलेला ड्रीम प्रोजक्ट म्हणजे रंधा फॉल येथे 'काचेचा पुल' मंजुर करण्यात आला होता. त्याला स्थगिती मिळाली होती; परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळे ती स्थगिती उठली असून हा प्रकल्प मार्गी लागला असून तो लवकरच प्रत्यक्षात साकारणार आहे. काचेचा पुल हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. . या प्रोजेक्टमुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून स्थानिकांनाही रोजगार वाढणार आहे. धरण जलाशयावरचा निळवंडे धरणाच्या वरील राज्यातला सर्वांत मोठा पिंपरकणे पूल रखडला होता. तोही पूर्णत्वास जात असून त्यासाठी आपण केलेले प्रयत्न आलेले यश यामुळे परिसरातील राजूरशी तुटलेला १५ गावांचा संपर्क पुन्हा एकदा प्रस्थापित होताना राजूरची बाजारपेठ आणखी फुलेल, तसेच हा उड्डाणपूलही पर्यटकांचे आकर्षण ठरणार असुन इथे परिसरात काही पर्यटनवाढीसाठी पर्यटकांना सोयी सुविधा निर्माण करणार आहेत. अकोले तालुक्यातील प्राचिन मंदिरांचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरवठा सुरू असून तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत इतर मंदिरांबरोबरच या मंदिरांचाही विकास करणार आहेत. पर्यटक, भाविक मोठ्या संख्येने इथे येतात. त्याठिकाणी त्या मंदिराचा इतिहास आणि पौराणिक महात्म्य सर्वांना समजावे, यासाठी 'आमची मंदिरे हे अभियान लवकरच राबविणार आहे. या मंदिरांना विकासासाठी काही निधी प्राप्त झालाय आणि अजून काही प्राप्त होणार आहे गोदावरी पार्कच्या धर्तीवर अकोले येथे प्रवरा पार्क प्रवरा नदीच्या काठावर निर्माण करण्यासाठी त्याला काही प्रमाणात यश आले आहे. अकोले तालुक्याची काही गोष्टीमुळे ओळख आहे. जसा राजूरचा पेढा, अकोल्याची आवळा कँडी, चाळीस गाव डांगाणाचा भात, रानमेवा, रानभाज्या याचेही मार्केटिंग करण्याचा मानस असून या क्षेत्रात काम करणान्या मंडळींसोबत चर्चा सुरु आहे. तज्ज्ञ लोक यावर सध्या काम करीत आहेत यातून आपण रोजगार निर्मितीचा आपण विचार करतोय. प्रत्यक्षात एक वेगळे मॉडेल आपण लवकरच विकसित करणार आहोत, लवकरच अकोले तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. पर्यटनाचे फेज मिळविण्यास प्रयत्न करीत आहे. गेल्या ४० वषाँत जी कामे झाली नाहीत. ते आपण मार्गी लावली आहेत एआयडीसी, उप जिल्हा ग्रामीण रुग्णालय, रंध्याचा काचेचा पुल, कोत पूल, तोलारखिंड फोडणे, अकोले बसस्थान अकोले बाजारतळ, पिंपरकने उड्डाणपुल अनेक कामे मार्गी लावलेअसून, आणखीही कामे मार्गी लागत आहेत.

No comments:

Post a Comment

बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.

*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...