म.टा.वृत्तसेवा,आपल्या धन्याच्या , सुख दुःखात वाटेकरी होत शेतीतून सोने
उगविनाऱ्य शंकर ने खूप कष्ट उपसले मात्र त्याने धन्याची मध्येच साथ सोडली
काळजाला धक्का देणारी घटना बिरेवाडीत घडली . शंकर नावाच्या बैलाच्या
निधनाने बिरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांवर दुःखाचे सावट कोसळले. आज
मानवजातीचे दशक्रिया व अंत्यविधी बघितले. प्राणी माञावर दया करा व
वृक्षसंवर्धन करा असा संदेश शंकर नावाच्या बैलाच्या दशक्रिया विधीतुन दिसुन
आला. आज शंकर या जगातुन सोडून गेल्याने काय परीस्थिती निर्माण होते अशी
घटना बिरेवाडीत घडली . संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील बिरेवाडीतील
धोंडीभाउ खंडु ढेंबरे व त्यांची मुले दिगंबर व दत्तात्रय यांनी बैल पाळला
होता . व त्याचे नाव शंकर हे ठेवल्याने त्याला शंकर नावानेच हाक मारत होते.
शंकर व ढेंबरे कुटुंबियांची चांगलीच घट्ट मैञी जमली होती. जवळपास 15
वर्षे शंकरचा सांभाळ केला . शंकरला या 15 वर्षात कधीही मालकाचा पाठिवर
चाबकाचा मार माहित नव्हता . शंकर इतका शांत होता की जवळ गेल्यावर कधीही
कोणाला मारले नाही . पण आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचेही चालेना
नियतीपुढे मृत्यु अटळ असल्याने रविवार दि 25 जुन 2017 रोजी अचानक शंकरची
प्राणज्योत मावळल्याने एकच धक्का ढेंबरे कुटुंबियांना बसला . पण शंकर
सर्वाचा आवडता झाला होता . शंकरचा दशक्रिया विधी मंगळवार दि 4 जुलै रोजी
आषाढी एकादशी निमित्त शंकरचा दशक्रिया विधी बिरेवाडीतील ग्रामस्थ महिला
तरूण यांच्या उपस्थितीत पार पडला . शंकरच्या नावाने पिंडदान पाडुन विशेष
म्हणजे शंकरच्या पिंडेला काकस्पर्श झाल्याने एकच चर्चा झाली. तसेच एकादश
असल्याने फराळाचा प्रसाद करण्यात आला होता. दशक्रिया विधी विधीवत
रूढीपरंपरेनुसार बिरेवाडीतील महादेव मंदिराजवळ पार पडला . पण शंकरच्या
दशक्रिया विधीतुन प्राण्यांचे व वृक्षाचे संगोपन हा उपदेश दिसुन आला .
शंकरच्या निधनाने परीवारावर दुःख कोसळले होते . शंकर जगाला सोडून जरी गेला
पण तर त्याची आठवण आंब्याचे झाड लावून त्या झाडाचे नाव शंकर ठेवले . व त्या
झाडाचे संगोपन करून शंकर ची आठवण स्मरणात राहील असे धोंडीभाउ ढेंबरे यांनी
सांगितले.
Attachments area
No comments:
Post a Comment