म. टा . वृत्तसेवा ,अकोले- ठाणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणार्या
शहापूर-घाटघर रस्त्याचे २००१
मध्ये सर्वेक्षण होऊन ही गेली १५ वर्षे हा रास्ता रखडला होता . लालफीत
च्या कारभारात अडकलेल्या या रस्त्याचे पुन :सर्व्हेसाठी तसेच
शासनस्तरावरील विविध परवानग्यासाठी२०१६-१७या चालू आर्थिक वर्षाच्या
अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे .
त्यामुळे या कामाला वेग येणार आहे व अकोले मुंबई अंतरी कमी होणार आहे . या
रस्त्यासाठी जमीन संपादन व सर्वेषणाचेकाम लवकरच सुरु होणार असल्याची
माहिती माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी महारष्ट्र टाईम्स शी बोलताना
दिली आहे . गेली
दहा वर्षापासून खासदार झाल्यानंतर या भागाला वेळोवेळी भेट देऊन प्रसंगी
पायी दौरा करून हा रस्ता होण्यासाठी मुख्यमंत्री ,सार्वजनिक बांधकाम मंत्री
यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहे . तर
सध्याच्या सरकार मध्ये असणाऱ्या मंत्री व खासदार यांना हा रस्ता किती
महत्वाचा व आदिवासी तरुणांना रोजगार , पर्यटन याबाबी सांगून प्रश्न मार्गी
लावण्यात आला आहे . तर पुढे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण पाठपुरावा
करणार असल्याचे वाकचौरे म्हणाले आदिवासी भागातील इको सेन्सिटिव्ह ,
तोलारखिंड हे प्रश्न धसास लावण्यासाठी लवकरच दिल्ली येथे जाउन प्रश्न
सोडवणार असल्याचे हि ते म्हणाले यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम
भांगरे , धनंजय संत , भाऊसाहेब वाकचौरे , वसंत मानकर आदी उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा.
*बैलपोळा....* *आदिम सांस्कृतीक मूल्यांचा सोहळा....* 🖊️ बैलांप्रती कृतज्ञता, आदर, ऋण,प्रेम व्यक्त करणारा बैल पोळा महत्वाचा सण असून हा विशे...
-
दैनिक पुण्यनगरीच्या प्रवाह पुरवणीत *शिक्षणाची बेटं* सदरात *हरहुन्नरी आणि कार्यमग्न शिक्षक डॉ. सुधीर कुंभार* यांच्या कामाविषयी *भाऊसा...
-
म . टा . वृत्त सेवा , अकोले -"आली आली डोंगरची काळी मैना "दहा रुपयाला आठवा , घ्याल तर हसाल न घ्याल तर फसाल , अशी जोरदार आरो...
No comments:
Post a Comment