म. टा . वृत्तसेवा ,अकोले- ठाणे व अहमदनगर जिल्ह्याला जोडणार्या
शहापूर-घाटघर रस्त्याचे २००१
मध्ये सर्वेक्षण होऊन ही गेली १५ वर्षे हा रास्ता रखडला होता . लालफीत
च्या कारभारात अडकलेल्या या रस्त्याचे पुन :सर्व्हेसाठी तसेच
शासनस्तरावरील विविध परवानग्यासाठी२०१६-१७या चालू आर्थिक वर्षाच्या
अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे .
त्यामुळे या कामाला वेग येणार आहे व अकोले मुंबई अंतरी कमी होणार आहे . या
रस्त्यासाठी जमीन संपादन व सर्वेषणाचेकाम लवकरच सुरु होणार असल्याची
माहिती माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी महारष्ट्र टाईम्स शी बोलताना
दिली आहे . गेली
दहा वर्षापासून खासदार झाल्यानंतर या भागाला वेळोवेळी भेट देऊन प्रसंगी
पायी दौरा करून हा रस्ता होण्यासाठी मुख्यमंत्री ,सार्वजनिक बांधकाम मंत्री
यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहे . तर
सध्याच्या सरकार मध्ये असणाऱ्या मंत्री व खासदार यांना हा रस्ता किती
महत्वाचा व आदिवासी तरुणांना रोजगार , पर्यटन याबाबी सांगून प्रश्न मार्गी
लावण्यात आला आहे . तर पुढे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आपण पाठपुरावा
करणार असल्याचे वाकचौरे म्हणाले आदिवासी भागातील इको सेन्सिटिव्ह ,
तोलारखिंड हे प्रश्न धसास लावण्यासाठी लवकरच दिल्ली येथे जाउन प्रश्न
सोडवणार असल्याचे हि ते म्हणाले यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम
भांगरे , धनंजय संत , भाऊसाहेब वाकचौरे , वसंत मानकर आदी उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधनानंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया!
हरित साधक शोभाताईनी पतीच्या निधना नंतर जिद्दीने फुलवली ‘निसर्ग’ची हिरवी दुनिया! पतीच्या निधनानंतरही शोभाताई डगमगल्या नाहीत. कष्ट, आत्मविश्...
-
लेख म . टा . वृत्तसेवा , संगमनेर-- सहकार चळवळ ही ग्रामीण विकासाचा कणा आहे.महाराष्ट्र व एकूण देशात ग्रामीण भागात जे परिवर्तन आणि प्...
-
श्री क्षेत्र धारेराव मंदिर कुमशेत 🙏 महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका आदिवासी, डोंगराळ व दूर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. अशा य...
No comments:
Post a Comment