निसर्गाच्या शाळेत रमताना मुलांचा सर्वांगिण विकास होतो . '.डॉ . ललिता ताई गुप्ते
आदिवासी अतिदुर्गम भागातील जि.प. प्रा . शाळा
भोजदरावाडी शाळेत डॉ . ललिताताई गुप्ते ( संचालिका आपुलकी , पुणे ) यांनी
निवासी सात दिवस आदिवासी मुलांसमवेत राहुन बालसंस्काराला कृति शिलतेची जोड
दिली . राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या डॉ . ललिताताई गुप्ते भोज दरवाडी
शाळेत पाच वर्षांपासून येतात .आपुलकी ही पुणेस्थित संस्था असून संस्थेच्या
मार्फत ताई या शाळेला आपली शाळा मानुन आर्थिक व वस्तु रुपाने सदभाव देणगी
देत असतात .आपुलकी संस्थेने 'आपुलकी ' जपत विदयार्थि व ग्रामस्थांना आपलेसे
केले. मागिल वर्षी गुप्ते परिवाराकडून नानासाहेब गुप्ते पुण्यस्मरणा
निमित्त प्रोजेक्टर भेट दिला होता याही वर्षी त्यांनी शाळेत वीजेची गरज
लक्षात घेऊन शाळेस इन्व्हर्टर भेट दिला . सामाजिक बांधिलकी जपत या संस्थेने
गरजु महिलांना साडयांचे वाटप केले .
सात दिवस
चाललेल्या या कार्यक्रमात प्रामुख्याने दररोज एक दिनविशेष साजरा केला .
मुलांना उपयोगी पडणारे शाब्दिक खेळ , चित्र रंगवणे गाण्यांच्या भेंडया ,
महापुरुषांच्या गोष्टी', प्रेरणा गीत, कवायत प्रकार , मैदानी खेळ ,
मुलांच्या घरी गृहभेटी दिल्या . शेवटचा दिवस मुलाखतींनी गाजला , मुलांनी
अनेक प्रकारचे प्रश्न विचारले
समारोप कार्यक्रमाच्या
वेळी बोलताना डॉ. ललिताताई गुप्तेताई म्हणाल्या की " निसर्गाच्या शाळेत
रमताना मुलांनी शिकयला हवं ,शाळेत बागेत फुलणाऱ्या पाकळीकडून बोध घ्यायला
हवा व दरवळणारा परिमल घेताना स्वच्छंद आनंद अनुभवावा . या स्पर्धेच्या
युगात संस्कारक्षम पिढी निर्माण होणे गरजेचे आहे.बालवयात
व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंचा विकास होत असतो याच गोष्टीचा उपयोग करुन
मुलांना आपण आकार देऊ शकतो . मुलांच्या या विकासाच्या अवस्थेमध्ये पालक आणि
शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची असते. अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख श्री
.मोरे साहेब होते .या कार्यक्रमास राज्य आदर्श शिक्षक अंकुश भांगरे ,
विस्तार अधिकारी सोमनाथ सुकटे उपक्रम शिल शिक्षक निवृत्ती चौधरी, शिवाजी
आवारी, भिमा कोंडार, पांडूरंग भांगरे आदि उपस्थित होते . सुत्रसंचालन
मुख्याध्यापक मच्छिंद्र भाईक यांनी केले आभार लक्ष्मण आंबेकर यांनी मानले
Attachments area
No comments:
Post a Comment